पुणे : महाराष्ट्रात मागील काही महिन्यापासून महापुरूषांच्या बेताल वक्तव्यांची मालिका सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून अशी बेताल वक्तव्य सातत्याने केली जात आहे. यावरून एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे. यातच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे.
“बिहारप्रमाणे ओबीसी समाजाची जनगणना करा”, छगन भुजबळांची पत्राद्वारे मागणी
महाराष्ट्राच्या राजकीय पंरपरेला सुसंस्कृतपणाचा, नम्रतेचा आणि संस्कारांचा मोठा वारसा आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत राज्यातील नेत्यांची वक्तव्ये आणि भाषेचा स्तर बघता राज्याच्या वैभवशाली राजकीय पंरपरेला कुठंतरी तडा जात असल्याचं दिसतं. असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
“आमच्या मागे चामुंडा मातेचा आशीर्वाद, 40 लोकं जमा करणं सोपं नव्हतं”, भाजप नेत्यांच वक्तव्य चर्चेत
राजकारणात येणारी माझ्यासारखी नवीन फळी सर्वपक्षीय नेत्यांचा आदर्श घेत असते, परंतु नेतेच असं वागणार असतील तर काय आदर्श घेणार? हे असंच चालू राहिलं तर राजकारणाकडे पाहण्याचा युवांचा दृष्टीकोन निगेटिव्ह होऊन ते राजकारणापासून दुरावतील. तसं होऊ नये याची सर्वपक्षीय नेत्यांनीच दक्षता घ्यावी. असंही त्यांनी म्हटलं आहे.
राजकारणात येणारी माझ्यासारखी नवीन फळी सर्वपक्षीय नेत्यांचा आदर्श घेत असते,परंतु नेतेच असं वागणार असतील तर काय आदर्श घेणार? हे असंच चालू राहिलं तर राजकारणाकडे पाहण्याचा युवांचा दृष्टिकोन निगेटिव्ह होऊन ते राजकारणापासून दुरावतील.तसं होऊ नये याची सर्वपक्षीय नेत्यांनीच दक्षता घ्यावी.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 9, 2023
Read also
- “ऊर्फीनंतर आता चित्रा वाघ यांनी गौतमी पाटीलकडे मोर्चा वळविला”, म्हणाल्या, तिचे व्हिडीओ..,
- इंदोरीकर महाराजांच्या सासुबाई भाजपात, राधाकृष्णा विखे पाटील अन् थोरातांमध्ये जोरदार दावा
- मोठी बातमी..! “सुरतवरून गुवाहाटीला जाणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदाराला एसीबीची नोटीस”
- शिवसेना कार्यालय माझ्या वडिलांच्या नावावर, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठोकला दावा
- “चित्रा वाघ मेरी सासू, आय. लव्ह. यु. चित्रा वाघ”; ऊर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं