मुंबई : शिवसेनासारख्या पक्षातून 40 लोकं जमा करणं सोपं नव्हतं. पण ते सोपं वाटतं नव्हंत कारण पुढारी कसे असतात तुम्हाला माहिती आहे. मात्र हे सर्व सगळे आमच्या पाठीशी उभे राहिले. त्यातच आमच्या मागे चामुंडा मातेचा आशीर्वाद होता. त्यामुळेच आमचा मिशन यशस्वी ठरलं असं वक्तव्य भाजप आमदार गिरीश महाजन यांनी केलं. त्यावर आता खासदार संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरे गटाच्या तिसऱ्या आमदाराच्या घरी एसीबी पोहचले..! साळवी, नाईक अन् आता नितीन देशमुख
गिरीश महाजन यांच्या बोलण्यावरून एक स्पष्ट झालं आहे की, भाजपचं जुनं स्पप्न होतं. शरद पवार यांचे स्वप्न नव्हतं. ते भारतीय जनता पार्टीचं होतं. त्यांच्या जे पोटात होतं ते ओठावर आले आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांचं मी अभिनंदन करेल असं संजय राऊत यांनी भाजपला टोला हाणला आहे.
नेतेच असं वागणार असतील तर काय आदर्श घेणार? रोहित पवारांचा राजकीय नेत्यांना सवाल
संजय राऊतांनी यावेळीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. राज्यपाल जर शासन चालवणार असतील तर निवडून आलेल्यांचं काय करायचं. महाविकास आघाडी सरकार असतांना राज्यपाल फारच सक्रिय होते. जणू काही तेच राज्यकर्ते, तेच राज्य सरकार चालवत होते. तेच पत्र लिहित होते. आता त्यांची पत्र दुसरं कोणी लिहीत आहे का ? असा खोचक सवालही त्यांनी केला.
Read also
- सत्तासंघर्षाची सुनावणी ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी..! सर्व काही प्रेमानं होईल; संजय राऊत
- “खासदारकीसाठी भाजपने ऑफर दिली तरी भाजपात जाणार नाही”, ठाकरे गटाचे खासदार निंबाळकरांचं विधान
- अमृता ताईंचा ऊर्फीला एक मोलाचा सल्ला..! म्हणाल्या,”ऊर्फीला मला इतकं सांगायचं आहे की…,”
- “तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 40 आमदार अपात्र ठरतील”; कोर्टात आज ठाकरे-शिंदेंचा फैसला
- “नसीब बदले या न बदले…वक्त जरूर बदलता है..!” राऊतांचं ते ट्विट चर्चेत