नवी दिल्ली : ठाकरे आणि शिंदे यांच्या याचिकांवरील सुनावणी आणखी लांबणीवर ढकलली आहे. आता येत्या पुढील सुनावणी ही १४ फेब्रुवारी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यातच १४ फेब्रुवारीपासून सर्व काही प्रेमानं होणार अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे त्या सुनावणीत नेमकी काय होईल, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नेतेच असं वागणार असतील तर काय आदर्श घेणार? रोहित पवारांचा राजकीय नेत्यांना सवाल
आज सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी वेळी खासदार संजय राऊत, अनिल देसाई, आणि अनिल परब हे देखील उपस्थित होते. तर शिंदे गटातील वकिलांनाकडून निहार ठाकरे उपस्थित होते. तसेच हे प्रकरण आता पाच न्यायधीश खंडपीठाकडून ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार का? यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
“ऊर्फीनंतर आता चित्रा वाघ यांनी गौतमी पाटीलकडे मोर्चा वळविला”, म्हणाल्या, तिचे व्हिडीओ..,
१४ फेब्रुवारीपासून घटनापीठ सलग सुनावणी घेणार आहेत. ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मुख्य न्यायाधीशांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील हे प्रकरण आम्ही ऐकू. असं संजय राऊतांनी म्हटलं. तसेच कोर्टात कपिल सिब्बल यांनी १४ फेब्रुवारी हे वॅलिटाईन डे आहे. शुभ दिवस आहे. त्यावर राऊत म्हणाले की, त्यादिवसापासून सर्व काही प्रेमानं होणार. असं राऊत म्हणाले.
इंदोरीकर महाराजांच्या सासुबाई भाजपात, राधाकृष्णा विखे पाटील अन् थोरातांमध्ये जोरदार दावा
सध्या सर्वोच्च न्यायालयात पाच याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शिवसेना नेमकी कुणाची, 16 आमदारांच्या निलंबणाची याचिका, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्षांवरील अविश्वास ठराव, आणि निवडणुक चिन्ह याबाबत याचिका दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी सादर केल्या आहेत. त्यामुळे यावर काय निकाल लागणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- “खासदारकीसाठी भाजपने ऑफर दिली तरी भाजपात जाणार नाही”, ठाकरे गटाचे खासदार निंबाळकरांचं विधान
- अमृता ताईंचा ऊर्फीला एक मोलाचा सल्ला..! म्हणाल्या,”ऊर्फीला मला इतकं सांगायचं आहे की…,”
- “तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 40 आमदार अपात्र ठरतील”; कोर्टात आज ठाकरे-शिंदेंचा फैसला
- “नसीब बदले या न बदले…वक्त जरूर बदलता है..!” राऊतांचं ते ट्विट चर्चेत
- ठाकरे गटाच्या तिसऱ्या आमदाराच्या घरी एसीबी पोहचले..! साळवी, नाईक अन् आता नितीन देशमुख