मुंबई : शिवसेनेचा धनुष्यबाण हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच मिळणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त तीनच माणसं शिल्लक राहतील. यात आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब अशी टिका अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केली आहे. त्यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांना प्रत्यु्त्तर दिलं आहे.
सत्तासंघर्षाची सुनावणी ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी..! सर्व काही प्रेमानं होईल; संजय राऊत
जोपर्यंत महाराष्ट्र हा हिंदूचा आहे. छत्रपती शिवरायांचा आहे. तोपर्यंत शिवसेना त्याच ताकदीने राहणार आहे. रावी राणा यांनी बच्चू कडू यांनी केलेल्या आरोपांवर लक्ष्य द्यावे. आपल्या शिक्षण संस्थेबाबतच्या आरोपांविषयी काय काय बोलतात. ते बघा. तसेच अमरावतीचे तुम्ही आमदार आहात. आमच्या वहिनी खासदार आहात. ते सांभाळा. असा सल्लाही त्यांनी रवी राणा यांना दिला आहे. तसेच आम्हाला तोंड उघडायला लावू नका, अन्यथा अशा इशाराही त्यांनी दिला आहे.
“खासदारकीसाठी भाजपने ऑफर दिली तरी भाजपात जाणार नाही”, ठाकरे गटाचे खासदार निंबाळकरांचं विधान
तसेच कोर्टातल्या तारीप पे तारीप मुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. त्यामुळे जोपर्यंत कोर्टातला निकाल लागत नाही.तोपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- “उपटसुंभ लोकांना उत्तर द्यायला मी बांधील नाही,” अजित पवारांचा पडळकरांवर हल्लाबोल
- “संजय राऊतांची ती भविष्यवाणी खोटी ठरणार”; मंत्री दिपक केसरकर
- “ऊर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा अशी कशी तु गं सास..”; ऊर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं
- “धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच मिळणार, ठाकरेंसोबत फक्त तीन लोकं शिल्लक राहणार”
- “शिवसेना फोडण्याचं शरद पवारांचं नाही तर भाजपचंच जुनं स्वप्न होतं”