संपादक / मिलिंद वैद्य
पिंपरी चिंचवड : मुंबईसह राज्यातील दहा महानगरपालिकांच्या निवडणुका नजीकच्या काळात जाहीर होऊ शकतात हे विचारात घेऊन राजकारण तापू लागले आहे. पिंपरी चिंचवड शहरात देखील भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आरोप प्रत्यारोनांच्या फैरी झडू लागल्या आहेत. निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने पाहिले, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजूनही आपल्या पराभूत मानसिकतेतून बाहेर आलेली दिसत नाही. भाजपने ज्या ताकदीने तयारी सुरु केली; त्या तुलनेत राष्ट्रवादीसह इतर पक्ष अजूनही बॅकफूटवर आहेत. निवडणुकीसाठी भाजपचा विकासाचा अजेंडा आहे तर राष्ट्रवादी अजूनही मुद्द्यासाठी चाचपडत आहे. त्याचा परामर्श आपण पुढे पाहू. तूर्तास भाजपने लोकांपुढे विकासाचं कार्ड घेऊन जाण्याचा निर्धार केलेला दिसतो, त्यावर नजर फिरवू.
1993 च्या बॉम्बस्फोटातील नरसिंह राव यांचा अहवाल बाकी, तो आला की…; चंद्रकांत पाटीलांचा इशारा
राष्ट्रवादीचा अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या बालेकिल्ल्यात शिरकाव करून भाजपने राष्ट्रवादीची पंधरा वर्षांची सत्ता अक्षरशः उखडून टाकली. पिंपरी चिंचवड शहराच्या तसेच भाजपच्या इतिहासात असे पहिल्यांदा घडले. त्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली नव्या दमाच्या नगरसेवक सदस्य मंडळाने सूत्रे हाती घेतली. विकासापासून वंचित असणाऱ्या अन्यायग्रस्त अशा अठरा गावांसह शहराच्या समतोल विकासाचा कार्यक्रम हाती घेऊन नव्या राज्यकर्त्यानी कामाला सुरवात केली. कारभार पाहताना अनुनभवी पदाधिकाऱ्यांकडून चुका झाल्याही असतील; परंतु, त्या सुधारण्याचा प्रयत्न करत मागील पाच वर्षांत भाजपने आम्हीही चांगले काम करू शकतो, हे शहरवासीयांना दाखवून दिले आहे. समाविष्ट गावे आणि दुर्लक्षित भाग डोळ्यासमोर ठेऊन शहराचा समतोल विकास करण्याचे धोरण भाजपने हाती घेत पाच वर्षांत भरीव कामगिरी केली हे नाकारता येणार नाही. कोरोनासारख्या महामारीमुले दोन वर्ष अडचणीची ठरली सुमारे सातशे कोटींनी महापालिकेचे उत्पन्न घेतले, तरी देखील महापालिकेची विकास कामे डोळ्यात भरतो. याचे श्रेय महापालिका प्रशासनाला आणि तितकेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांना द्यायला हवे.
रशिया युक्रेन युद्धाचे विचलित करणारे दृश्य; सोशल मीडियावर व्हायरल
शहरातील मेट्रो रेल्वे प्रकल्प, आंद्रा धरणाचे १०० एमएलडी पाणी, भामा-आसखेड धरणातून थेट जलवाहिनी टाकून २६७ एमएलडी पाणी आणण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या खेरीज समाविष्ट गावांतील अंतर्गत रस्ते, पाणी व वीज पुरवठा, दवाखाने, क्रीडांगणे, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र, टाळगाव चिखली येथील आंतरराष्टीय दर्जाचे संतपीठ निगडीच्या भक्ती शक्ती चौकातील दोन माजली उड्डाणपूल आणि समतल विलगक (ग्रेड सेपरेटर), पिंपळे सौदागर येथील जगताप डेरी चौक आणि डांगे चौकातील उड्डाण पूल आणि ग्रेड सेपरेटर, वायसीएम रुग्णालयाचे विस्तारीकरण, पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणे, त्यासाठी अद्ययावत इमारत उभी करणे, पिंपरी, भोसरी, आकुर्डी येथील हॉस्पिटलच्या अद्ययावत प्रशस्त इमारती बांधणे, उपनगरांतील अंतर्गत रस्त्यांचे ड्रेनेज व नवीन जलवाहिन्यांसह काँक्रीटीकरण करणे या सारखी अनेक स्थापत्य,यांत्रिकी,विद्द्युत विषयक तसेच आरोग्य,क्रीडा, सामाजिक कल्याणकारी भरीव कामे भाजपच्या पाच वर्षाच्या कालावधीत झाली. यातील अनेक महत्वाच्या प्रकल्पांचा स्वतंत्र आढावा आपण पुढील काळात घेणार आहोत. हजारो कोटींची कामे मार्गी लागली आहेत.
मुसलमानाला स्वतंत्र जगण्याचा अधिकार नाही का? नवाब मलिकांच्या मुलीचा सवाल
या शिवाय केंद्राची स्मार्टसिटी योजना, अमृत योजना, प्रधानमंत्री आवास योजनेतून गरीब जनतेला परवडतील अशी घरे बांधून देणे, शहराचे सुशोभीकरण आणि त्याच बरोबर स्वच्छ भारत अभियानाची यशस्वी अमलबजावणी, सुशिक्षित बेरोजगारांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, निराधार महिलांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, गरीब विद्यार्थ्यंसाठी शिष्यवृत्ती, अर्थ साहाय्य, खेळाडूसाठी प्रशिक्षण असे अनेक योजना राबविल्या.
ईडीपासून काळजी घ्या, एवढा अहंकार बरा नव्हे; राजू शेट्टींचा अजित पवारांना गंभीर इशारा
वास्तविक, पंधरा-वीस वर्ष सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांच्या जेष्ठ नेते मंडळींनी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून शहराच्या सर्वांगीण विकासाठी, प्रगतीसाठी भाजप सारख्या नवख्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करायला पुढे यायला हवे होते. परंतु, ते न करता प्रत्येकवेळी खो घालण्याचा प्रयत्न केला. हे सामान्य जनतेलाही पटले नाही. ज्यांनी विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार केला; त्यांना भाजपच्या कारभारातही भ्रष्टाचारच दिसू लागला. ज्यांच्या डोळ्यावरचा चष्मा देखील भ्रष्टाचाराने मिळवलेला त्यांना भ्रष्टाचाराशिवाय दुसरे दिसणार तरी काय ? सत्तेविना तडफडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला पराभूत मानसिकतेतून अजूनही बाहेर येता आले नाही. मुद्द्यासाठी ते आजही चाचपडताहेत, या उलट भाजपच्या विकासाचा अश्वमेध जनतेच्या अंगणापर्यंत पोचला आहे, तो रोखण्याचे सामर्थ्य गटातटांत विखुरलेल्या राष्ट्रवादीत उरलेले आहे, असे वाटत नाही. परंतु, त्यासाठी भाजपचे देखील डोळे उघडे असायला हवेत हे नक्की !
Read also:
- संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीचा दणका
- मुख्यमंत्री सहा महिन्यांपासुन बेपत्ता, आता मंत्री देखील कुणाला सापडणार नाहीत – चंद्रकांत पाटील
- आता सरकार स्वतः बरखास्त होऊन राष्ट्रपती राजवट लागू होईल – आमदार रवी राणा
- उत्तर प्रदेशमधील प्रचारसभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकार जोरदार हल्ला ; म्हणाले…;
- किरीट सोमय्यांकडून महाविकास आघाडीच्या ‘डर्टी डझन’ मंत्र्यांची लिस्ट जाहीर