जालना : जालन्यातील घटनेचे राज्यभरात पडसाद उमटू लागले आहेत. सोलापूरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको करण्यात आला आहे. तर लातूरमध्येही मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे. यातच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे. मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ ही भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या वतीने सरकारचा निषेध करत मोर्चाही काढण्यात आला.
हेही वाचा…मुंबई महापालिकेत खिचडी घोटाळा, अनेकांवर गुन्हे दाखल, ठाकरेंच्या नेत्यांवर भाजपचा आरोप
शिवसेनेचे युवानेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी देखील यावर टिका केलीय. महाराष्ट्रात स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करणंही अशक्य झालंय, दडपशाही करणारं मिंधे भाजपा सरकार युवकांच्या जीवावर उठलंय! जालन्यात आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या समुदायावर झालेला लाठी हल्ला हा संतापजनक आहे. लोकशाही पद्धती चिरडून हुकूमशाहीच्या दिशेना वाटचाल सुरु आहे. असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.
हेही वाचा…“मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मार्ग काढण्याची सरकारची तयारी, कृपया शांतता राखा,” अजित पवारांचं आवाहन
दरम्यान, पहिला हल्ला वारकऱ्यांवर, आता मराठा समाजातील तरुणांवर… मिंधे-भाजपा राजवट म्हणजे सध्याची मुघलाईच! आपलं राज्य लूटायचं, दिल्लीसमोर राज्य झुकवायचं, सरकारं पाडायची… निर्लज्जपणाचा कळस गाठलाय! पण महाराष्ट्र फार काळ हे सहन करणार नाही, परिवर्तन अटळ आहे! असा इशारा देखील त्यांनी दिलाय.
महाराष्ट्रात स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करणंही अशक्य झालंय, दडपशाही करणारं मिंधे भाजपा सरकार युवकांच्या जीवावर उठलंय!
जालन्यात आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या समुदायावर झालेला लाठी हल्ला हा संतापजनक आहे. लोकशाही पद्धती चिरडून हुकूमशाहीच्या दिशेना वाटचाल सुरु आहे.पहिला हल्ला…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 1, 2023
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड, मराठा आरक्षण आंदोलन चिघळलं
हेही वाचा…“हिंसक वळण देऊन आंदोलनाला बदनाम करण्याचा काही मंडळींचा प्रयत्न सुरूय,” अशोक चव्हाणांचा रोख नेमका कुणाकडे ?
“आतापर्यंत जातीसाठी माती खाल्ली, आता रयतेसाठी लढा”, वंचितने आरक्षणाचा फॉर्म्यूला मांडला
हेही वाचा…“मराठा समाज सहन करतो म्हणून परीक्षा..,”उदयन राजे यांनी दिला सरकारला कडक इशारा
हेही वाचा…“गृहमंत्र्यांनी आपली जबाबदारी स्विकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,” शरद पवारांची अप्रत्यक्षपणे मागणी