जालना : जालन्यातील घटनेचे राज्यभरात पडसाद उमटू लागले आहेत. सोलापूरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको करण्यात आला आहे. तर लातूरमध्येही मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे. यातच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे. मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ ही भूमिका घेतली आहे. यावरून आता खासदार उदयनराजे यांनी आंदोलनकांची भेट घेतली आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पुर्ण केलं नाही,” शरद पवारांचा जालन्यातून हल्लाबोल
मराठा समाजाने ५७ मोर्चे काढले, पण कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मराठा समाज सहन करतो म्हणून परीक्षा बघाल, असा अर्थ होत नाही. सर्व पक्षांनी विशिष्ट समाजाला घेऊन राजकारण केलं. मात्र, सर्वात मोठ्या मराठा समाजाकडं दुर्लक्ष केलं अशी खंत उदयनराजे यांनी व्यक्त केली. लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, जखमी रूग्णांच्या उपचाराची जबाबदारी सरकारने घ्यावे, लाठीचार्जबाबत न्यायालयीन चौकशी सुरू करावी, अन्य समाजाला न्याय मिळतो, मग मराठा समाजाला न्याय का मिळत नाही? शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवावं असंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“फडणवीसांची मराठा समाजाशी दगाबाजी, याच दगाबाजीविरूद्ध मराठा समाज पेटून उठलाय”
दरम्यान, गायकवाड कमिशनमध्ये थोड्याफार चुका होत्या. त्यात दुरूस्ती करून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करावं. मी सर्वांना आवाहन करतो. आपल्याला शांततेन आंदोलन करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण पाईक आहोत. मराठा समाजाला न्याय मिळत नसेल, तर यापेक्षा दुर्दैवी बाब नाही,” असंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“गृहमंत्र्यांनी आपली जबाबदारी स्विकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,” शरद पवारांची अप्रत्यक्षपणे मागणी
हेही वाचा…मुंबई महापालिकेत खिचडी घोटाळा, अनेकांवर गुन्हे दाखल, ठाकरेंच्या नेत्यांवर भाजपचा आरोप
हेही वाचा…“मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मार्ग काढण्याची सरकारची तयारी, कृपया शांतता राखा,” अजित पवारांचं आवाहन
हेही वाचा…जालना लाठीचार्ज प्रकरण…! “कृत्याची दाहकता मन खिन्न करणारी,” संभाजी राजे सरकारवर संतापले