जालना : गोवरी प्रकरणात आदिवासी मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाची राजीनामा दिला होता. याही घटनेत गृहमंत्र्यांनी आपली जबाबदारी स्विकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी अप्रत्यक्षपणे मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलीय. जालना येथे आंदोलकांवर झालेल्या घटनेचा शरद पवारांनी निषेध व्यक्त केला. तर जालन्यात जाऊन त्यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“फडणवीसांची मराठा समाजाशी दगाबाजी, याच दगाबाजीविरूद्ध मराठा समाज पेटून उठलाय”
राज्यातील मुख्यमंत्र्यांशी विचारविनिमय केला. त्यांच्याशी बोलणं झालं. एका ठराविक दिवसात प्रश्नांची तड लावण्याचं ठरलं. काही चर्चा झाली. आश्वासने दिली. दुर्दैवाने जे काही ठरलं होतं. त्याची अंमलबाजावणी झाली नाही. त्यामुळे मनोजने निर्णय घेतला. आपण समाजासाठी पडेल ती किंमत द्यायची आणि त्यासाठी उपोषणाचा कार्यक्रम घेतला. आजचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे. असं शरद पवारांनी म्हटलंय.
हेही वाचा…“भाड्याने जमवलेली पार्टी म्हणजे भाजप”, ठाकरेंची मुंबईत भाजपवर जोरदार फटकेबाजी
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, मी काल सर्व माहिती घेतली. मनोज आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करायला पोलीस आले. त्यांनी बोलणी केली. एका बाजूला चर्चा सुरू केली आणि दुसऱ्या बाजूने पोलीस मोठ्या संख्येने आणले गेले. चर्चा चालू असतांना एका बाजूने बळाचा वापर करून काही लोकांवर लाठी हल्ला केला. बळाचा वापर केला. एवढचं नाही तर हवेत गोळीबार केला. त्याशिवाय अलिकडच्या काळात बंदूकीतून छर्रे वापरतात. त्या छऱ्याचा मारा केला. मी रूग्णालयात गेलो. काही लोक असे होते त्यांच्या अंगावर छर्रे मराले गेले. छोट्या छोट्या गोळ्या मारल्या गेल्या.
READ ALSO :
हेही वाचा…मुंबई महापालिकेत खिचडी घोटाळा, अनेकांवर गुन्हे दाखल, ठाकरेंच्या नेत्यांवर भाजपचा आरोप
हेही वाचा…“मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मार्ग काढण्याची सरकारची तयारी, कृपया शांतता राखा,” अजित पवारांचं आवाहन
हेही वाचा…जालना लाठीचार्ज प्रकरण…! “कृत्याची दाहकता मन खिन्न करणारी,” संभाजी राजे सरकारवर संतापले
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पुर्ण केलं नाही,” शरद पवारांचा जालन्यातून हल्लाबोल