पुणे : राज्यात मागील काही दिवसांपासून गोळीबार घटनांमुळे महाराष्ट्र पुर्णपणे हादरून गेला आहे. पुण्यात सुरूवातीली कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे प्रमुख महेश पाटील यांच्यावर गोळीबार केली. तर जळगावमध्ये भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर गोळीबार केला. तर काल ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. त्यावरून आता राज्यात विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवकर अभिषेक घोसाळकर यांची गोळी घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरूवारी दहिसर येथे फेसबुक लाईव्ह करत असताना मॉरिस नरोन्हा उर्फ मॉरिस भाई या व्यक्तीने घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात गोळीबाराच्या घटनांमुळे एकच खळबळ उडाली आहे. यावरून तीन चाकी सरकारची कामगिरी छान, आज झाला बिहार उद्या होईल अफगाणिस्तान अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.
हेही वाचा…शिवसेना पक्ष सोडा, पक्षांतर करा, नाहीतर तुरूंगात जा,” ठाकरे गटाच्या माजी मंत्र्याला शिंदे गटाच्या धमक्या
महाराष्ट्राचा बिहार झाला, असे म्हणण्यात आता काहीच अर्थ उरला नाही. कारण, महाराष्ट्राने बिहारला खूप मागे सोडलं आहे. गुंडांनी जणू काही महाराष्ट्र आपल्या मुठीत बंदिस्त करून टाकला आहे. हतबल सरकार उघड्या डोळ्यांनी सारं काही पाहतंय. पोलिसांची दहशतच संपली आहे. पोलीस दलात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे पोलिसांनाही मर्यादा येत आहेत. पोलिसांवर फक्त विरोधकांना संपवण्याची जबाबदारी आहे; कायदा आणि सुव्यवस्था गेली खड्ड्यात ! दुर्देवं आहे, महाराष्ट्राचे. असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…“पुण्यात अजित पवार गटाने कार्यालयावर ताबेमारी केली तर..” जयंत पाटलांनी दिला थेट इशारा
इतक्या घटना घडूनही सरकारला लाज कशी वाटत नाही. जनता हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघतेय; जनतेमधील रोष वाढतोय. पण, लोकांचा जीव जाणे, याला सरकारच जबाबदार आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे. परवा कल्याण, आज मुंबई… अजून काय माहित किती घटना घडणार आहेत? कधी पुणे, कधी ठाणे तर कधी मुंबई खुनांचा थरार सुरूच आहे. असेही ते म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे असे मी रोज सांगत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज गुंड टोळ्याना भेटतात. पक्षात प्रवेश देतात. गृहमंत्री अदृश्य झाले आहेत. राज्य गुंडांच्या तावडीत आहे. म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलिस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार धक्कादायक आहे. अभिषेक मृत्यूशी झुंज देतोय..आणि गृहमंत्री फडणवीस चाय पे चर्चा करीत फिरत आहेत !फडणवीस राजीनामा द्या! अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिरूर लोकसभेसाठी अमोल कोल्हे, तर हडपसर विधानसभेत जगताप ? शरद पवार गटाने कंबर कसली
हेही वाचा…“मोदींचा जन्म ओबीसी समाजात नाही तर तेली समाजात झाला,” राहुल गांधीचं वक्तव्य, भाजपा राज्यभर आंदोलन करणार
हेही वाचा…कोण आहे मॉरिस नरोन्हा ? फेसबुक लाईव्हमध्येच ठाकरे गटाच्या नेत्याला संपवलं, घटनेचा थरारक CCTV व्हिडीओ
हेही वाचा…महाराष्ट्र हादरलं…! ठाकरे गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून ह’त्या’, आरोपींनीही स्वत: ला संपवलं
हेही वाचा…“..म्हणून काँग्रेस पक्ष सोडला”, बाबा सिद्दीकींनी सांगितलं कारण, ‘त्या’ पक्षाची ताकद वाढवणार