पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात 18 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पहिल्या टप्प्यात एकाही अपक्ष तसेच महिला आमदाराला संधी देण्यात आली नाही. यावरून राज्यातील विरोधी पक्षांनी त्यांच्यावर सडकून टिका केली. तर अपक्ष बंडखोर आमदार बच्चू कडू यांनी देखील यावर उघड उघडपणे नाराजी व्यक्त केली. आता यावरूनच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप आणि नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.
“तात्काळ बैठक बोलवा, अन्यथा लढा उभारावा लागेल”; संभाजीराजेंचा शिंदे सरकारला इशारा
अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि आरे कारशेडच्या फाईल फडणवीसांनी लगेच पास केल्या. पण ज्या एसटी महामंडळ कामगारांचा राजकारणासाठी वापर केला त्यांच्या विलीनीकरणाचा सोयीने विसर पाडला. एसटी कर्मचाऱ्यांच्या साधेपणाचा फायदा घेऊन आकांडतांडव करणारे “नागोबा” आता शांत का आहेत. असा सवाल देखील त्यांनी केला. तसेच त्यांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना देखील अप्रत्यक्ष टोला लगावला.
“शिवसेनेवर टीका करताना विरोधकांनी विचार करावा”; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
महाविकास आघाडी सरकार असताना अमरावतीचे अपक्ष आमदार आणि खासदार नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्टहास केला होता. त्यानंतर मुंबईत खुप मोठा राडा झाला. याप्रकरणी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत तुरूंगात देखील ठेवलं होतं.
“एकनाथ शिंदेंनी स्वतःचा पक्ष काढावा, नाही तर उद्या भाजप तुमच्यावर संकट आणेल”
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांचं हनुमान चालिसाचं ट्रेंड चालवला होता. ज्याठिकाणी राणा दाम्पत्य जात होते. त्या त्याठिकाणी त्यांच्याजवळ हनुमान चालिसा होती. यावरून आता हिंदुत्वासाठी जीवाचं रान करणारे रवी राणा ,हनुमान चालीसा खिशात घालुन फिरणारे रवी राणा, अखेर वैफल्यग्रस्त झालेत. देवेंद्र फडणवीस ठरवतील त्यांना मंत्री पद मिळतं याचा अर्थ त्यांना नव्याने”देवेंद्र चालीसा” वाचण्याची गरज आहे. रवीराणा यांना धर्म रक्षणार्थ मंत्रिपद मिळालेच पाहिजे. असं म्हणत अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
Read also
- “मग तुम्ही आता करुणा मुंडेंची माफी मागणार आहात का?”; भाजपचा राष्ट्रवादीला सवाल
- नितीश कुमारांनी वावटळ निर्माण केलंय, त्याच वादळात रूपांतर झालं तर..; शिवसेनेचा भाजपला इशारा
- “केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुद्धा भाजपसोबतची युती तोडणार”?
- “अतिवृष्टीग्रस्तांच्या राज्य सरकारने तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय फक्त”; अजित पवारांची सडकून टिका
- वाढदिवस शिवसेनेच्या आमदाराचा अन् घोषणा राष्ट्रवादीच्या आमदाराची