अमरावती : राज्याचे माजी राज्यमंत्री आणि प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा सकाळी अपघात झाला. रस्ता ओलांडतांना त्यांना दुचाकीस्वारीने धडक दिल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्या हाताला, डोक्याला, आणि पायाला दुखापत झाली आहे. सुरूवातीला त्यांना एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच सकाळी त्यांची तब्येतही चांगली असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र त्यानंतर लगेचच त्यांना आता नागपुर येथे शिप्ट करण्यात आले आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त केला आहे.
कोकण विभागात आघाडीकडून बाळाराम पाटलांना उमेदवारी..! शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा धुराळा
बच्चू कडू यांनी गेल्या काही काळात सातत्याने घेतलेल्या भूमिकेचे संदर्भ आमदार मिटकरी यांनी दिले आहे. सध्याच्या सरकारविरूद्ध बच्चू कडूंनी सातत्याने घेतलेली बंडाची, विद्रोहाची भूमिका तर या अपघातामागे नाही ना? असा सवाल अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. यावर आता पुढे काय घडणार त्याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
कोकण विभागात आघाडीकडून बाळाराम पाटलांना उमेदवारी..! शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा धुराळा
दरम्यान, दरम्यान, या अपघाताची माहिती खुद्द बच्चू कडू यांनी आपल्या ट्विटवरून दिली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, आज सकाळी रस्ता क्राॅस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठिक असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये. असं त्यांनी म्हटलं आहे. त्यातच कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांची मुंबईतील रूग्णालयात भेट घेतली. त्यामुळे सध्या आमदारांच्या अपघातांची मालिका सुरू असल्याने अनेक कार्यकर्त्यांना याची चिंता वाटू लागली आहे.
Read also
- “सरकार शोबाजीत जास्त व्यस्त, नवे करण्याची मानसिकता राहिली नाही”; राष्ट्रवादीची खोचक टिका
- सोमय्यांचे पुतळे जाळले, टाळ्या वाजवल्या, घोषणाबाजी दिली, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक
- “गिरीश महाजांनाना ते क्रेडीट घेण्याची गरज नाही”; बंडखोर आमदारांचा गिरीश महाजनांना टोला
- “तुम्हीच आमच्या मनातील मुख्य़मंत्री..!” फडणवीसांकडे बोट दाखवून नवनीत राणांचं वक्तव्य
- “पदवीधर निवडणुकीतील तिकीटावरून भाजप-शिंदे गटात धुसफुस, अनेकांची नाराजी