कोल्हापुर : राज्यात झालेल्या पक्ष फुटीमुळे आगामी निवडणुकांचं गणितं पुर्णपणे बदलून गेलं आहे. यातच आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाबाबत अलिकडेच बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीने वंचितला देखील समावून घेतलं आहे. यातच आता कोल्हापुर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा सांगितला आहे.
हेही वाचा…“तर आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवू,” महेश लांडगे यांनी दिली इशारा, प्रकरण काय ?
कोल्हापुर लोकसभा मतदारसंघात सध्या विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी ठाकरेंची साथ सोडली. तर दुसऱ्या बाजूला हातगणंकलेचे खासदार धैर्यशिलराव माने यांनी देखील शिंदेंची वाट धरली. आता या दोन्ही मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा सांगितला आहे. तर यासाठी कोल्हापुर लोकसभा मतदारसंघातून विजय देवणे आणि संजय घाटगे हे ठाकरे गटाकडून निवडणुक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. तर हातकणंगलेमधून सुजित मिनचेकर आणि उल्हास पाटलांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…“जेव्हा घड्याळ चिन्ह घेतलं तेव्हा मला भीती वाटायची की…”, जंयत पाटील असे काय बोलून गेले ?
दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागावाटपात सर्वाधिक ठाकरे गटाला जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर कॉंग्रेस तर तिसऱ्या क्रमाकांवर शरद पवार गटाला जागा मिळण्याची शक्यता आहे. यातच वंचित आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेला देखील प्रत्येकी एक जागा सोडण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पक्ष फुटीनंतर ठाकरे अन् शिंदे गटात कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच, असंख्य कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश
हेही वाचा…शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला ‘या’ तीन नावांचा प्रस्ताव, सूत्रांकडून महत्त्वाची बातमी
हेही वाचा.“जनता मूर्ख नाही, सगळं जाणते”, ‘या’ मराठी अभिनेत्रीने अजित पवार गटावर साधला अप्रत्यक्ष निशाणा
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्हाच्या पाठीमागे निर्णयाच्या अदृश्य शक्तीचा हात, अदृश्य शक्ती नेमकी कोण ?
हेही वाचा…मोठी बातमी..! शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे तीन नाव पाठवली!