कर्जत : १९९९ साली घड्याळ चिन्ह घेतलं तेव्हा मला भीती वाटायची की घड्याळ लोकांपर्यत पोहोचेल का ? ते नवीन होतं. त्यामुळे तेव्हा घड्याळाचे प्लॅस्टिकचे बिल्ले छापून मी लहान मुलांकडे देऊन त्याचं वाटप करायचो. पण लोक आपल्यापेक्षा फार पुढे आहे. लोक चिन्ह ओळखतातच, पण नाव कुणाचं हेही बघायला विसरत नाही. त्यामुळे आता चिन्हाची भीती बाळगू नका आणि कामाला लागा. असे आदेश शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले. राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्ह गेल्यानंतर शरद पवार गटाचा पहिलाच कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्रात विजय निश्चित मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“जखमी वाघ अधिक धोकादायक असतो”, रोहित पवारांनी राष्ट्रवादीची तुलना केली महाभारताशी!
राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी तुम्ही १० ते १२ लोक कोणत्या नावाने काम करणार आहात. यासाठी पक्षाचं नाव द्यायचं आहे. कदाचित ते नाव पुढेही वापरलं जाईल. ज्या नावानिशी घराघरांत पोहोचवण्याचं काम करायला हवं. नवीन चिन्हही घराघरांत पोहोचवायला हवं. असेही जयंत पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातल्या कार्यकर्त्यांना सांगितले.
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्ह गेलं, शरद पवारांची पुढची भूमिका काय ?
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून आता विधानसभा निहाय विजय निश्चित मेळावा आयोजित केले जात आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच स्थानिक आमदार, पदाधिकारी तसेच इतर नेते या मेळाव्यात सहभागी होत आहेत. यातच काल निवडणुक आयोगाने निकाल दिल्यानंतर शरद पवार गट आणखीनच आता सक्रीय झालेला दिसून येत आहे.
READ ALSO :
हेही वाचामोठी बातमी…! राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाबाबत नार्वेकरांचा मोठा दावा, म्हणाले…
हेही वाचा…शरद पवारांच्या हातातून राष्ट्रवादी निसटली, दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेत कार्यकर्त्यांचा ओघ वाढला, असंख्य कार्यकर्ते शिंदे गटात दाखल
हेही वाचा…वाह रे पठ्या..! मनसेने राष्ट्रवादीच्या प्रकरणात दारूगोळा भरला, अजित पवारांवर चढवला हल्ला
हेही वाचा…निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, “स्वत: ला राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून उल्लेख करत..,”
हेही वाचा…“शरद पवारांचे कोणीही काका-मामा राजकारणात नव्हते, तेव्हा…,” सुप्रिया सुळे राष्ट्रवादी निकालाच्या विरोधात कडाडल्या