मुंबई : राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्ह निवडणुक आयोगाने अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला. तर या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. काल निवडणुक आयोगाचा निकाल जाहिर होताच अजित पवार गटाकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला तर दुसऱ्या बाजूला राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली. यातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रकणाची तुलना महाभारताशी केली आहे. तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा फोटो ट्विट करत जखमी वाघ अधिक धोकादायक असतो असंही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी, आयत्या प्रकल्पांवर उबाठा,” भाजप अन् ठाकरे गटात रंगलं ट्विटवॉर
रोहित पवार यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात महाभारतात घडलेल्या प्रसंगाप्रमाणेच आज राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थिती आहे. कुरूक्षेत्रावरील लढाईपुर्वी दुर्योधन आणि अर्जून श्रीकृष्णाला भेटण्यासाठी गेले. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण झोपले असल्याने त्यांची झोप होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय या दोघांकडे पर्याय नव्हता. दुर्योधनाच्या मनात खच्चून अंहकार भरलेला असल्याने तो भगवान श्रीकृष्णाच्या पायाजवळ न बसता उशाजवळ बसला पण अंगी कमालीची नम्रता असल्याने अर्जून भगवान श्रीकृष्णाच्या पायाशी बसला. भगवान श्रीकृष्णाने झोपेतून डोळे उघडताच त्याला प्रथम पायाशी बसलेला अर्जुन दिसला आणि त्याला विचारलं तुला काय पाहीजे? तेंव्हा अर्जुनाने सांगितलं तुमचं मार्गदर्शन आणि भगवान श्रीकृष्णाने त्याला होकार दिला.
हेही वाचा…“मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या अधिसूचनेला शरद पवार गटाचा विरोध”, म्हणाले….
नंतर श्रीकृष्णाची नजर उशाशी बसलेल्या दुर्योधनाकडे गेली असता त्यालाही विचारलं तुला काय हवंय? यावेळी अहंकाराने मदमस्त झालेल्या दुर्योधनाने विचार केला एकट्या श्रीकृष्णाला आपल्या सोबत घेण्याऐवजी त्याची विराट नारायणी सेना घेतलेली कधीही फायदेशीर ठरेल. म्हणून स्वार्थी विचाराच्या दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णाकडे त्यांची नारायणी सेना मागितली आणि भगवान श्रीकृष्णानेही ती दिली. अखेर एका बाजूला भगवान श्रीकृष्णाचं मार्गदर्शन लाभलेला अर्जुन तर दुसऱ्या बाजूला विराट नारायणी सेना सोबत असलेला दुर्योधन यांच्यात कुरुक्षेत्रावर झालेल्या तुंबळ युद्धात विजय हा अर्जुनाचाच झाला. कारण त्याच्या बाजूने साक्षात भगवान श्रीकृष्ण होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही आज हेच घडतंय.. ‘महाशक्ती’च्या माध्यमातून नारायणी सेना त्यांच्या बाजूने असली तरी श्रीकृष्णाने जसं अर्जुनाला मार्गदर्शन केलं त्यातून प्रेरणा घेऊन आदरणीय पवार साहेब हे आमच्यासोबत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राजकीय कुरुक्षेत्रावर महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि अहंकाराला गाडण्यासाठी लढतोय आणि शेवटी विजय आमचाच होणार. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
महाभारतात घडलेल्या प्रसंगाप्रमाणेच आज राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती आहे. कुरुक्षेत्रावरील लढाईपूर्वी दुर्योधन आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी गेले त्यावेळी भगवान श्रीकृष्ण झोपले असल्याने त्यांची झोप होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय या दोघांकडे पर्याय नव्हता. दुर्योधनाच्या… pic.twitter.com/BNM65ZRHPM
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 7, 2024
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्ह गेलं, शरद पवारांची पुढची भूमिका काय ?
हेही वाचा…मोठी बातमी…! शरद पवार गटाच्या नव्या राजकीय पक्षाचं नाव आणि चिन्ह ठरलं
हेही वाचा…“काकाचा पक्ष पुतण्याच्या ताब्यात,” राष्ट्रवादी पक्ष नाव आणि चिन्ह अजित पवारांना, निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय
हेही वाचाजरांगे पाटलांचा १० फेब्रुवारीपासून पुन्हा एल्गार..! सरकारला दिला पुन्हा हा इशारा
हेही वाचा…दिल्लीत पाठवले तर दुधात साखर पडेल, शर्मिला ठाकरेंकडून लोकसभेचे संकेत