रायगड : मागच्या लोकसभा निवडणुकीत रायगडकर मोदी लाटेत वाहून गेले नाहीत. त्याचा आम्हाला अभिमान आहे. आजही रायगडकर ताठ मानेने उभे आहेत. रायगडमध्ये यावेळी सुद्धा मोदींविरोधात त्सुनामा सारखं मतदान होणार, असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद मेळाव्यातून अजित पवार गटातील एकमेव रायगडचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना मोठं आवाहन उभं केलंय. पुढील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी रायगडचा दौरा करत याच मतदारसंघात तब्बल पाच जाहीर सभा घेतल्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सभांमुळे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांना घाम फुटल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“त्या आरोपातून तुम्ही आता अडवाणींना दोषमुक्त केलं आहे का ?”, प्रकाश आंबेडकरांचा भाजपला सवाल
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातून जनसंवाद दौऱ्याची सुरूवात केली. रायगड जिल्ह्यातील पेण अलिबाग, रोहा, पोलादपुर, म्हसळा आणि माणगाव या सहा ठिकाणी उद्धव ठाकरेंची तोफ शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपवर चढवली. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टिका करत रायगडकर पुढील निवडणुकीत मोदींच्या विरोधात त्सुनामी सारखं मतदान करणार आणि आपला उमेदवार निवडून आणणार असं जाहीर आवाहन ठाकरेंनी जनतेला केलं. यावेळी ठाकरेंच्या सर्वच सभांना लोकांचा मोठा प्रतिसाद बघायला मिळाला. तर ठिकठिकाणी नागरिकांनी उद्धव ठाकरे यांचं जोरदार स्वागत केले.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचा केवळ दोन हजार मतांनी निसटता पराभव झाला होता. रायगड लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी तटकरेंना पराभवाची धुळ चारली होती. परंतु त्याची परतफेट तटकरेंनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केली. यातच आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाकडून अनंत गिते पुन्हा निवडणुक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांनी ठाकरेंच्या जनसंवाद सभांमधून देखील बोलून दाखवलं आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांनी कोट्यवधी रूपये बुडवल्याचा गायकवाडांचा आरोप, एक मुख्यमंत्री आमदाराचे पैसे कसे बुडवू शकतात ?
रायगड लोकसभा मतदारसंघात पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, दापोली, गुहागर असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यातील अलिबाग, महाड, आणि दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. तर फक्त गहागर विधानसभा मतदारसंघातील आमदार भास्कर जाधव हे सध्या ठाकरे गटात आहेत. यातच पेण विधानसभा मतदारसंघात भाजपचे रविंद्र दगडू पाटील तर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार आणि मंत्री आदिती तटकरे आमदार आहेत. रायगड हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी कागदावर हा मतदारसंघ महायुतीसाठी भक्कम आहे. परंतु सध्या पक्षात झालेली फाटाफुट यामुळे रायगडकर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बाजूने उभे राहतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा….“राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली”, आदित्य ठाकरेंनी गुन्ह्यांची थेट कुंडलीच मांडली..!
दरम्यान, २०२४ च्या निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून म्हणजेच महायुतीकडून सुनील तटकरे यांना पुन्हा उमेदवारी शक्यता नाकारता येत नाही. तर दुसऱ्या बाजूला हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे असला तर या लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची ताकद अधिक दिसून येतेय. यातच महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ ठाकरेंना सुटला तर याठिकाणी पुन्हा माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास तटकरे विरूद्ध गिते असा सामाना पुढील निवडणुकीत अटातटीचा ठरण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तिसऱ्यांदा उमेदवारी मागण्यासाठी बारणेंनी पहिला कामाचा अहवाल द्यावा”, मावळात लोकसभा उमेदवारीवरून महायुतीत मोठी धुसफूस
हेही वाचा..“तर पेट्रोलच्या टाकीवर पाण्याची टाकी लिहून ते आगीवर ओतायला लावतील”,अजित पवार गटाने आव्हाडांना डिवचलं
हेही वाचा….“गुन्हेगारांचा बाप सागर बंगल्यावर बसला आहे का ?” विरोधकांचा राज्य सरकारला सवाल
हेही वाचा…गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाड यांना १४ तारखेपर्यंत कोठडी, कोर्टात जोरदार युक्तिवाद
हेही वाचा…राज्यसभा निवडणुक..! “सहाव्या जागेसाठी सगळ्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा विचार करायला हवा”