मावळ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या आधीच रंगत बघायला मिळत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांनी दावा सांगितला आहे. तर विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी न देता अजित पवार गटाच्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात यावी, असा आग्रह आता अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी धरला आहे. यातच श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी हवी असेल तर त्यांनी आपल्या कामांचा अहवाल द्यावा, असं जाहीर आव्हान सुनील शेळके यांनी बारणेंना दिल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…“त्या आरोपातून तुम्ही आता अडवाणींना दोषमुक्त केलं आहे का ?”, प्रकाश आंबेडकरांचा भाजपला सवाल
राज्यात भाजप, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची सत्ता असली तरी मावळात तिन्ही पक्ष एकत्रित कार्यक्रमात दिसत नाहीत. नुकत्याच तळेगावात झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमासाठी भाजपचे नेते बाळा भेगडे यांनी पाठ फिरवल्याने भाजपचे नेते राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला हजेरी लावत नाहीत. असा सुर सुनील शेळके यांनी भाजपवर आवळला. यातच कामगार मंत्र्यांचे सहकार्य न मिळाल्याने जनरल मोटार्सची लढाई हरलो अशी खंत देखील वडगाव येथील आयोजित पत्रकार परिषदेत सुनील शेळके यांनी व्यक्त करून दाखवली.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांनी कोट्यवधी रूपये बुडवल्याचा गायकवाडांचा आरोप, एक मुख्यमंत्री आमदाराचे पैसे कसे बुडवू शकतात ?
दरम्यान, मावळची जागा राष्ट्रवादीलाच मिळाली पाहिजे असं म्हणत शेळकेंनी त्याचं कारणही स्पष्ट करून सांगितलं. राष्ट्रवादीने मावळ मतदारसंघात अनेक कामे मंजूर करून आणली आहेत. हिवाळी अधिवेशनात माळव तालुक्यासाठी चार वर्षात २४०० कोटी निधी मिळाला. तसेच ४३ कोटी ७३ लक्ष रूपयांचे जिल्हा मार्ग ग्रामीण मार्ग, तसेच आदिवासी विभागाकडून ३२ कोटी, तसेच वडेश्वरच्या मुला मुलींच्या आश्रमशाळेला १२ कोटी ५८ लाख, तसेच कान्हे फाटा ते सावळा या ४२ किलोमीटरचा रस्त्यासाठी ३३६ कोटी रूपयांचा निधी पक्षांनी मिळवला असल्याचंही सुनील शेळके यांनी सांगितलं. तर दुसऱ्या बाजूला आगामी लोकसभा निवडणुकीत श्रीरंग बारणेंशी आपले वैर नसून फक्त तिसऱ्यांदा उमेदवारी मागण्यासाठी त्यांनी आपल्या कामाचा अहवाल द्यावा, एवढेच आपले म्हणणे असल्याचं सांगून सुनील शेळके यांनी मावळाची जागा राष्ट्रवादीलाच हवी, असा पुनरूच्चार केला.
READ ALSO :
हेही वाचा…“आरक्षणाच्या नावावर लोकांची डोकी फोडू नका,” विरोधकांनी सरकारला दिला कडक इशारा
हेही वाचा..“तर पेट्रोलच्या टाकीवर पाण्याची टाकी लिहून ते आगीवर ओतायला लावतील”,अजित पवार गटाने आव्हाडांना डिवचलं
हेही वाचा….“गुन्हेगारांचा बाप सागर बंगल्यावर बसला आहे का ?” विरोधकांचा राज्य सरकारला सवाल
हेही वाचा…गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाड यांना १४ तारखेपर्यंत कोठडी, कोर्टात जोरदार युक्तिवाद
हेही वाचा…राज्यसभा निवडणुक..! “सहाव्या जागेसाठी सगळ्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा विचार करायला हवा”