नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाआहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या एक्स खात्यावरून माहिती दिली आहे. लालकृष्ण आडवाणी यांच्या भारतीय राजकारणातील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. काही दिवसांपुर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते जननायक कर्पुरी ठाकूर यांना भारत सरकारतर्फे भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. देशातील प्रमुख नेत्यांनी याबाबत अभिनंदन केलं आहे. परंतु वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यावरून टिका केली आहे.
हेही वाचा..“सहा गोळ्या झाडल्या, मग थेट महेश गायकवाडांच्या उरावर बसले”, घटनेचा धक्कादायक सीसीटिव्ही व्हिडीओ समोर
लालकृष्ण अडवाणी यांनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जीना यांच्या कबरीवर फुले वाहिली. तुम्ही त्यांना पक्षातून काढून टाकले. त्या आरोपातून तुम्ही अडवाणी यांना आता दोषमुक्त केलं आहे का ? असा सवाल करतानाच अडवाणी यांना पुरस्कार देणं हा भाजपचा फार्स आहे. अशी टिका देखील त्यांनी केली आहे. तसेच मराठा समाज आणि ओबीसींमध्ये तेढ निर्माण होणार नाही या दृष्टीकोनातून माझा प्रयत्न असेल. काही ओबीसी नेत्यांनी जाणीवपुर्वक तेढ निर्माण करायची आहे. गरिब मराठ्यांनी आम्हाला सत्ता द्यावी. आम्ही तोडगा देतो. त्या तोडग्यात ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असेल आणि मराठा समाजाचे आरक्षणाचे ताट वेगळं असेल असंही ते म्हणाले.
हेही वाचा..“लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार”,एकनाथ शिंदे म्हणाले.. की
दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांचे कल्याण, विकासाचा ध्यास आणि प्रखर हिंदुत्वाचा विचार अंगिकारत राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे पितृतुल्य व्यक्तिमत्त्व लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर होणे ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहावे या विचाराने रथयात्रा काढून आडवाणीजींनी जनजागृती केली. अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाल्यावर आडवाणीजींच्या योगदानाचे स्मरण ठेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा पुरस्कार जाहीर केला, हे आपल्या भारतीय संस्काराचे द्योतक म्हणावे लागेल. असे एकनाथ शिंदे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा..मुख्यमंत्र्यांनी कोट्यवधी रूपये बुडवल्याचा गायकवाडांचा आरोप, एक मुख्यमंत्री आमदाराचे पैसे कसे बुडवू शकतात ?
हेही वाचा.“राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली”, आदित्य ठाकरेंनी गुन्ह्यांची थेट कुंडलीच मांडली..!
हेही वाचा…भाजप आमदाराकडून शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार, शरद पवार म्हणाले..
हेही वाचा…“राज्यात असाच ‘गुंडाराज’ होत असेल, तर..”प्रकाश आंबेडकरांची गोळीबार प्रकरणावर मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…“पोलिसांसमोरच गोळीबार होत असेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे”, सुप्रिया सुळेंची मागणी