मुंबई : जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस स्टेशनमध्येच ही घटना घडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यावरून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…भाजप आमदाराकडून शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार, शरद पवार म्हणाले..
सत्ताधारी पक्षाचा एक आमदार मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मागासवर्गीय मंत्र्यांच्या कंबरेत लाथा घालण्याची भाषा करतो. हे सर्व चित्र पहात राज्यात गुंडशाही माजली असल्याचे दिसून येत आहे. जनतेच्या कष्टाचे पैसे लुटले जात आहेत. गुन्हेगारांचा बाप सागर बंगल्यावर बसला आहे का ? असा सवाल करत पुण्यात एका कार्यक्रमात प्रभू श्रीराम व सीतामातेचा अपमान होत होता. त्याला NSUI च्या मुलांनी विरोध केला तर त्यांच्यावरच कारवाई केली गेली. महाराष्ट्रात सध्या शिंदे -फडणवीस पवार यांचे गुंडाराज सुरू आहे. असा हल्लाबोल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर केला आहे.
हेही वाचा…“राज्यात असाच ‘गुंडाराज’ होत असेल, तर..”प्रकाश आंबेडकरांची गोळीबार प्रकरणावर मोठी प्रतिक्रिया
गणेशोत्सवाच्या काळात सत्ताधारी पक्षाचा आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला. परंतु त्यांच्यावर कारवाई झाली नाही. उलट सरकारने त्यांना प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षापदावर बसवले. पुण्यातील भाजप आमदार सुनील कांबळे यांनी पोलिसांना मारहाण केली. पोलिस आपले काहीच वाकडे करू शकत नाहीत. आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे, अशी मग्रुरीची भाषा सत्ताधारी पक्षाचा आमदार करतो. असेही नाना पटोले म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाड यांना १४ तारखेपर्यंत कोठडी, कोर्टात जोरदार युक्तिवाद
हेही वाचा…राज्यसभा निवडणुक..! “सहाव्या जागेसाठी सगळ्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा विचार करायला हवा”
हेही वाचा…“त्या आरोपातून तुम्ही आता अडवाणींना दोषमुक्त केलं आहे का ?”, प्रकाश आंबेडकरांचा भाजपला सवाल
हेही वाचा..मुख्यमंत्र्यांनी कोट्यवधी रूपये बुडवल्याचा गायकवाडांचा आरोप, एक मुख्यमंत्री आमदाराचे पैसे कसे बुडवू शकतात ?
हेही वाचा.“राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली”, आदित्य ठाकरेंनी गुन्ह्यांची थेट कुंडलीच मांडली..!