मुंबई : केंद्रीय निवडणुक आयुक्तांनी १५ राज्यातील ५६ जागांसाठी निवडणुक घोषित केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ जागांवर निवडणुक होणार आहे. येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून त्याच दिवशी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपला ३, शिंदे गट १ आणि कॉंग्रेसला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या वाटेला एक जागा जाण्याची शक्यता आहे. परंतु राज्यात पक्ष फुटीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार विभागले गेले आहे. त्यामुळे यानिवडणुकीत मतांचा बाजार मांडला जाण्याची शक्यता आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी सहावी जागेबाबत मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…“पोलिसांसमोरच गोळीबार होत असेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे”, सुप्रिया सुळेंची मागणी
भाजपचे विद्यमान खासदार नारायण राणे, प्रकाश जावडेकर, व्ही. व्ही. मुरलीधरन हे खासदार तर शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई. कॉंग्रेसचे खासदार कुमार केतकर आणि राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण निवृत्त होणार आहेत. त्यांना पुन्हा संधी दिली जाईल का ? की त्यांच्या जागी अन्य कुणाला संधी दिली जाईल. याची चर्चा सध्या दोन्ही बाजूंनी सुरू झाली आहे. यातच राज्यसभा निवडणुक बिनविरोध होणार ? असा सवाल करत सहाव्या जागेसाठी सगळ्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा विचार करायला हवा. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस मिळून ३० मते वेगळी आहेत. इतरही येतील. असेही राऊतांनी सांगितले आहे.
दरम्यान, राज्यात सध्या भाजप आणि शिवसेना या पक्षातील प्रत्येकी दोन आमदारांचे निधन झाल्यामुळे सध्या विधानसभेच्या आमदारांची संख्या २८६ झाली आहे. त्यामुळे २८६ भागिले ६ आणि अधिक एक असे मिळून राज्यसभेच्या उमेदवाराला विजयासाठी ४०.० मतांची आवश्यकता असणार आहे. यातच भाजपकडे सध्या १०४ आणि अन्य १३ अपक्षांची मतं मिळून भाजप ३ जागा सहजपणे निवडून आणू शकते. तर शिवसेनेकडे ३९ आमदार आणि १० अपक्षांची मतं मिळून शिंदे गटाला एक जागा मिळण्याची शक्यता तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसकडे ४५ आमदाराचं संख्याबळ असून कॉंग्रेसची एक जागा निवडून येण्यास काहीही अडचण येणार नाहीत.
हेही वाचा..“सहा गोळ्या झाडल्या, मग थेट महेश गायकवाडांच्या उरावर बसले”, घटनेचा धक्कादायक सीसीटिव्ही व्हिडीओ समोर
तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ५३ आमदार असून अजित पवार गटाला ४३ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या वाटेला एक जागा मिळू शकते. ही निवडणूक अशा पद्धतीने बिनविरोध होऊ शकते. परंतु सहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीने प्रयत्न केले तर मतांच्या फोडाफोडीचं राजकारण पुन्हा एकदा बघायला मिळू शकते. यातच महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार गटातील एकूण आमदारांची संख्या ही २५ पेक्षा जास्त नसून त्यांना अपक्षांची मदत मिळाली तर ही संख्या ४० ते ४१ होऊ शकते.
परंतु या निवडणुकीत आता विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानुसार शिवसेना ही एकनाथ शिंदेंची असून त्यामुळे त्यांनी नियुक्त केलेले प्रतोद भरत गोगावले यांचा व्हिप शिवसेनेच्या आमदारांना लागू होईल. यामध्ये ठाकरे गटाला मोठी अडचण ठरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचं प्रकरण अजूनही विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. निवडणुक होईपर्यंत निकाल लागला तर व्हीपचा मुद्दा राहणार नाही. परंतु निकाल लागला नाही तर हा वाद होण्याची शक्यता आहे.
राज्यसभा बिनविरोध होणार?
सहाव्या जागे साठी सगळ्यांनी
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा विचार करायला हवा!
शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून 30 मते वेगळी आहेत..इतरही येतील.@Dev_Fadnavis@supriya_sule
@https://t.co/d3pPhq5WAp— Sanjay Raut (@rautsanjay61) February 3, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“त्या आरोपातून तुम्ही आता अडवाणींना दोषमुक्त केलं आहे का ?”, प्रकाश आंबेडकरांचा भाजपला सवाल
हेही वाचा..मुख्यमंत्र्यांनी कोट्यवधी रूपये बुडवल्याचा गायकवाडांचा आरोप, एक मुख्यमंत्री आमदाराचे पैसे कसे बुडवू शकतात ?
हेही वाचा.“राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली”, आदित्य ठाकरेंनी गुन्ह्यांची थेट कुंडलीच मांडली..!
हेही वाचा…भाजप आमदाराकडून शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार, शरद पवार म्हणाले..
हेही वाचा…“राज्यात असाच ‘गुंडाराज’ होत असेल, तर..”प्रकाश आंबेडकरांची गोळीबार प्रकरणावर मोठी प्रतिक्रिया