बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारातमीत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकारणासंह विविध गोष्टींवर भाष्य केलं. यातच उद्या जेव्हा खासदारकीच्या निवडणुका येतील. तेव्ही मीच उमेदवार आहे म्हणून मतदान करा. यातच काही जण आमची शेवटची निवडणूक आहे असं म्हणतील. त्यांची शेवटची निवडणूक कधी होणार आहे हे माहित नाही. परंतु तुम्ही भावनिक होऊ नका. अशी विनंती अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केली. त्यावर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना जोरदार टोला लगावला.
हेही वाचा….“राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली”, आदित्य ठाकरेंनी गुन्ह्यांची थेट कुंडलीच मांडली..!
बारामतीत झालेल्या कार्यक्रमात अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी राजकारणासह व्यवसायावर देखील भाष्य केले. यावरून अजित पवार म्हणातात की एवढा वेळ मी माझ्या धंद्यासाठी दिला तर विमानाने आणि हेलिकॉप्टरमधून फिरेन, सध्या ते एसटी बसने आणि ट्रेनने फिरतात काय ? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना केला. त्यावर आता अजित पवार गटाचे युवा नेते सुरज चव्हाण यांनी आव्हाडांवर खोचक टिप्पणी केली आहे.
हेही वाचा…भाजप आमदाराकडून शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार, शरद पवार म्हणाले..
दरम्यान, राजकारणातील ठाण्याच्या राखी सावंत यांनी काल पुन्हा मीडिया पुढे प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला. माझी ही शेवटची निवडणूक आहे नंतर मी सक्रिय निवडणुक प्रक्रियेत भाग घेणार नाही असं साहेब म्हणाले होते. त्याचा संदर्भ जोडून दादा बोलले. परंतु राखी सावंतला मीडिया समोर येऊन सहानुभूती मिळवण्यासाठी नाटक करायचं होतं आणि केलं. राष्ट्रवादीत जितेंद्र आव्हाड म्हणजे एखाद्याच्या घराला आग लागली असेल तर पेट्रोलच्या टाकीवर पाण्याची टाकी लिहून ते आगीवर ओतायला लावतील आणि आग लावली म्हणून गावभर बोभाटा करत फिरतील असं नेतृत्व आहे. असा टोला सुरज चव्हाणांनी आव्हाडांना लगावला.
राजकारणातील ठाण्याच्या राखी सावंत यांनी काल पुन्हा मीडिया पुढे प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला..माझी ही शेवटची निवडणूक आहे नंतर मी सक्रिय निवडणुक प्रक्रियेत भाग घेणार नाही असं साहेब म्हणाले होते त्याचा संदर्भ जोडून दादा बोलले परंतु राखी सावंत ला मीडिया समोर येऊन सहानुभूती…
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) February 5, 2024
READ ALSO :
हेही वाचा….“गुन्हेगारांचा बाप सागर बंगल्यावर बसला आहे का ?” विरोधकांचा राज्य सरकारला सवाल
हेही वाचा…गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाड यांना १४ तारखेपर्यंत कोठडी, कोर्टात जोरदार युक्तिवाद
हेही वाचा…राज्यसभा निवडणुक..! “सहाव्या जागेसाठी सगळ्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा विचार करायला हवा”
हेही वाचा…“त्या आरोपातून तुम्ही आता अडवाणींना दोषमुक्त केलं आहे का ?”, प्रकाश आंबेडकरांचा भाजपला सवाल
हेही वाचा..मुख्यमंत्र्यांनी कोट्यवधी रूपये बुडवल्याचा गायकवाडांचा आरोप, एक मुख्यमंत्री आमदाराचे पैसे कसे बुडवू शकतात ?