पुणे । विशेष प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश नेतृत्त्वाने २०२४ मधील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेश पांडे यांना शिरुर लोकसभा समन्वयकपदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे ‘डॅशिंग’ आमदार महेश लांडगे यांची जबाबदारी काढून घेतली आणि त्यामुळे भाजपाने लांडगेंना धक्का दिला, अशी चर्चा जोर धरु लागली होती.
याबाबत सविस्तर माहिती माहिती घेतली असता, भाजपाकडून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर ‘महाविजय-२०२४’ अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात समन्वयक नेमले आहेत. यामध्ये शिरुरची जबाबदारी राजेश पांडे यांच्यावर दिली आहे, असे लक्षात आले.
हेही वाचा…उद्धव ठाकरेंना झटका..! पक्षचिन्ह, शिवसेना नाव याचिकेवरील तातडीच्या सुनावणीवर SC चा नकार
वास्तविक, पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात नव्याने समन्वयक भाजपाने नेमले आहेत. त्यामुळे काहीसा संभ्रम आहे. यापूर्वीच ‘लोकसभा निवडणूक प्रमुख’ म्हणून पुणे लोकसभा मतदार संघाची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे, बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार राहुल कुल यांच्याकडे आणि आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार महेश लांडगे यांच्याकडे दिली होती.
आता ‘महाविजय-२०२४’ अभियानांतर्गत राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघामध्ये स्थानिक पातळीवर समन्वयक करण्याच्या उद्देशाने ‘समन्वयक’पदाच्या नियुक्ती करण्यात येत आहेत. त्याअनुशंगाने राजेश पांडे यांच्याकडे शिरुर लोकसभा समन्वयक म्हणून नियुक्ती आहे. राजेश पांडे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून भाजपामध्ये आले आहेत. ते अभविपचे प्रदेशाध्यक्ष होते. आता ते भाजपाचे उपाध्यक्ष आहेत.
हेही वाचा…ना थोरात ना पटोले विरोधी पक्षनेतेपदी ‘या’ नेत्याची निवड, काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय!
मिथक काय आहे?
शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्याकडे होती मात्र आता ती जबाबदारी राजेश पांडे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे हा महेश लांडगे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
वस्तुस्थिती काय आहे?
भाजपा पक्ष संघटनेच्या पद संरचनेनुसार, लोकसभा निवडणूक प्रमुख, समन्वयक, प्रभारी आणि संयोजक अशी चार महत्त्वाची पदे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण केलेली आहेत. शिरुर लोकसभा निवडणूक प्रमुखपदी यापूर्वीच आमदार महेश लांडगे यांच्याकडे सोपवली आहे. त्यामध्ये कोणताही बदल नाही. महाविजय-२०२४ अभियानांतर्गत समन्वयकपदी राजेश पांडे यांनी नियुक्ती केली असून, लोकसभा प्रवास योजना प्रभारीपदी आमदार माधुरी मिसाळ कामकाज पाहत आहेत. तसेच, संयोजकपदी ॲड. धर्मेंद्र खांडरे आहेत. त्यामुळे महेश लांडगे किंवा अन्य कुणाचीही जबाबदारी काढली किंवा कमी केली आहे, असे नाही. याउलट, भाजपा पक्षश्रेष्ठी निवडणुकीची यंत्रणा आणखी सक्षम केली आहे, ही वस्तुस्थिती आहे.
हेही वाचा…अखेर.., राज्याला मिळाला विरोधी पक्षनेता, काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याच्या गळ्यात पडली माळ
महेश लांडगेंचा ‘टीआरपी’ खुपला…
पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानवांच्या अवमान संदर्भातील मुद्यावर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या भूमिकेचा तीव्र विरोध करीत प्रखरपणे भूमिका मांडली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरात लांडगे यांच्या भूमिकेचे आणि शिव-शंभू निष्ठेचे कौतूक झाले. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये ‘‘अरे ए अबू आझमी ऐक ना… शिवाजी महाराजांना मानतो मग औरंजेबाला का गळा लावतो?… तुझा संबंध काय औरंग्याशी..? हा व्हीडिओ तुफान गाजला. आमदार लांडगे यांचा ‘टीआरपी’ विरोधकांना खुपला. त्यामुळे पदनियुक्तीच्या मुद्यावर कोणीतरी खोडसाळपणा केला आहे, असे दिसून येते.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम होते, म्हणूनच..,” आव्हाडांचा भाजपला टोला
हेही वाचा…“..त्यामुळे राज्यात पुन्हा आघाडीचं सरकार येईल,” जयंत पाटलांचं भाकित
हेही वाचा…‘महाविजय २०२४’ ची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्या खांद्यावर ! ‘महाविजय २०२४’चे लोकसभा समन्वयकपद आणि ‘हर घर तिरंगा’ची जबाबदारी
हेही वाचा…विजय वडेट्टीवारांकडे विरोधी पक्षनेते पद, नाना पटोलेंचा प्रदेशाध्यक्षपदाचा धोका वाढला”
हेही वाचा…कोर्टातली सुनावणी लांबणीवर, उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले ‘तीन’ आदेश