मुंबई : केंद्र सरकारचं विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर अधिवेशनाच्या पुर्वीच विरोधकांची बैठक पार पडली. यातच उद्यापासून नव्या संसेदत पुढील कामकाज होणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. संसदेचे विशेष अधिवेशनात जुन्या संसेदत नरेंद्र मोदी यांचं शेवटचं भाषण होत आहे.
हेही वाचा…“पाठपुरावा करा, मंत्रीपद हे फक्त मिरवण्यासाठी नाही”, अजित पवारांनी मंत्र्यांनाच दिला दम
नवीन संसद भवनात घेतले जाणारे निर्णय अनेक अर्थाने महत्वाचे आहेत. मी सर्व खासदारांना विनंती करतो की, हे एक छोटसं अधिवेशन आहे. रडायला भरपूर वेळ आहे. पण, जुन्या वाईट गोष्टींना मागे सोडून नव्या संसदेत उत्साहाने पुढं जायचं आहे. असंही मोदींनी म्हटलं. तर आपण ऐतिहासिक संसद भवनातून निरोप घेतो आहे. पण जुनं संसद भवन येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देईन. भारताचं संसद भवन उभारण्याचं निर्णय ब्रिटीश शासनाचा होता. संसद भवन उभारण्यासाठी पैसे आणि मेहनत भारतीयांची होती. असंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा…“मुख्यमंत्री आले आणि गेले, ‘कोट्यावधी रूपयांचा झाला’ चुराडा, कॅबिनेट बैठक चर्चेत
दरम्यान, चंद्रावर भारताचा तिरंगा अभिमानाने फकडत आहे. शिवशक्ती पॉंइंट प्रेरणा बनलं आहे. चांद्रयान-३ हे प्रेरणेचे नवीन केंद्र आहे. जी-२० शिखर परिषदेचं यशामुळे भारत ग्लोबल साउथचा आवाज बनला आहे. २०४७ साली भारताला विकसित देश बनावयचा आहे. असंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…फडणवीस पेक्षा ठाकरे वरचढ..! फडणवीसांच्या ५ वर्षापेक्षा फक्त अडीच वर्षात ठाकरेंची कामगिरी दमदार
हेही वाचा…सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीवर ह’ल्ला, गाडीच्या काचाही फोडल्या, वाघमारे गंभीर जखमी
हेही वाचा…“ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, कोणावरही अन्याय होणार नाही”, उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना दिली ग्वाही
हेही वाचा…दुष्काळी मराठवाड्याला मंत्रिमंडळ बैठकीत काय मिळाले?; पाहा संपूर्ण यादी…
हेही वाचा…मराठवाडा वॉटरग्रिडचा मुद्दा गाजला, फडणवीसांची ठाकरेंवर टिका, आता दानवेंनी फडणवीसांना दिलं जोरदार प्रत्युत्तर