छत्रपती संभाजीनगर : ज्या वॉटर ग्रीड योजनेचा खून मविआ सरकारने केला असे घसा कोरडा करून उपमुख्यमंत्री बोलत होते, त्या योजनेचा पहिला टप्पा पैठण २८५ कोटी, गंगापूर-वैजापूर १०७५ कोटी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजूर झाल्या होत्या. कोणत्या तोंडाने म्हणता, की माविआ सरकारने काहीच केले नाही? जर ते सरकार अकार्यक्षम होते तर त्याच सरकारमधील दोघे प्रमुख एक नंबरचे नेते आजच्या सरकारमध्ये होते. मग ते सरकार आकारक्षम कसे? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीसांना केला आहे. मराठवाडा वॉटरग्रिडचा मुडदा पाडण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केला असा आरोप फडणवीसांनी केला होता. त्यावर आता अंबादास दानवे यांनी उत्तर दिलंय.
हेही वाचा…“तर केंद्रीय मंत्र्यांच्या दारासमोर कांदे, टोमॅटो फेकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही”, ‘या’ संघटनेने दिला सरकारला इशारा
पुढे बोलतांना अंबादास दानवे म्हणाले की, ५० मिनिटांच्या बैठकीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मराठवाडा अश्या परिस्थितीत असताना महागडे सूट बुक करण्यावर आम्ही बोट ठेवले. म्हणूनच मुख्यमंत्री महोदयांना शासकीय विश्रामगृहात राहायला जावे लागत आहे. मराठवाड्यचा अपेक्षाभंग आज मिंधे सरकारने केला आहे. जनता सर्व पाहते, एवढं लक्षात ठेवा. सरकारने सिंचनाच्या दृष्टीने ज्या घोषणा आज केल्या त्या मधील ‘पार-गोदावरी’ सिंचन योजना मुख्यमंत्र्यांनी सांगून दाखवावी. ज्या घोषणा आजच्या पत्रकार परिषदेत जाहीर झाल्या त्या म्हणजे ‘जुनी दारू आणि नवीन बाटली’ अश्याच आहेत. ज्या ‘हायब्रीड ऍन्युटी’ योजनेचा आज उल्लेख झाला, ही योजना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पोसण्यासाठी वापरली जात आहे. पैसे दिले गेले पण या योजनेतील प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही.
हेही वाचा…अबब..! मराठवाड्यासाठी शिंदेंनी दिलं तब्बल ‘इतक्या’ कोटी रूपयांचं पॅकेज, आकडा ऐकून थक्क व्हाल
ज्या गोष्टींसाठी अगोदरच अर्थसंकल्पीय तरतूद केली गेली, त्याच घोषणा यंदा केल्या आहेत. २०१६-२०२३ सालच्या घोषणा काढून पाहिल्या तर या दोन्हीत किंचितही फरक नाही. ज्या जालना सीडपार्कचा विषय आज केला गेला त्या सीडपार्क साठी तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीच जमीन उपलब्ध करून दिलेली आहे. त्यापुढे हे काम तसूभरही पुढे सरकले नाही. असंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“शासन आपल्या दारी, पैसे उधळतंय वाऱ्यावरी, मोर्चेकरी दारावरी, सरकार झाडतंय बंदोबस्ताच्या फैरी”
दरम्यान, १४ हजार कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन सिंचनाच्या कामाला चालना देण्याचा देखावा करण्यात आला. याच कामांच्या सर्वेक्षणासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली. अजून सर्वेक्षणच झालेले नाही तर मग १४ हजार कोटींची मान्यता कशी देता येऊ शकते? उद्धव ठाकरे सरकारने वैतरणा-मुकणे सिंचन प्रकल्पाला मान्यता दिली आहे. माझे आव्हान आहे या सरकारला कि त्यांनी हे काम पूर्ण करून दाखवावे. ज्या मराठवाड्याच्या प्रकल्पांची जंत्री आज वाचली गेली, त्यातील रक्कम ही मराठवाड्याच्यात ही नगण्य प्रमाणात खर्च झाली असल्याचं दानवेंनी सांगितलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“पाठपुरावा करा, मंत्रीपद हे फक्त मिरवण्यासाठी नाही”, अजित पवारांनी मंत्र्यांनाच दिला दम
हेही वाचा…“मुख्यमंत्री आले आणि गेले, ‘कोट्यावधी रूपयांचा झाला’ चुराडा, कॅबिनेट बैठक चर्चेत
हेही वाचा…“फडणवीसांना घडवण्यात माझा मोठा वाटा, मात्र नंतरच्या काळात फडणवीसांनी कुरघोडी केली”
“अमोल मिटकरींना निरमा पावडर अन् दुध गिफ्ट पाठवणार,” मिटकरी विरोधात रोहित पवार गट आक्रमक
हेही वाचा…मोठी बातमी…! सरकारकडून छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव शहरांचं नामकरण, परिपत्रकही काढलं