छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यासाठी तब्बल ५९ हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं आहे. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित पालकमंत्री आणि अधिकाऱ्यांचे कान टोचले आहेत.
हेही वाचा…अबब..! मराठवाड्यासाठी शिंदेंनी दिलं तब्बल ‘इतक्या’ कोटी रूपयांचं पॅकेज, आकडा ऐकून थक्क व्हाल
सुरूवातीपासून मराठवाड्यातील बैठकीवर विरोधकांनी जोरदार टिका केली. यानंतर आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर याठिकाणी पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यावरून अजित पवार म्हणाले की, आज मंत्रिमंडळ बैठकीत अनेक प्रस्तावांना मंजूरी देण्यात येईल. भविष्यात हे कामे होतात किंवा नाही हे पाहणे संबंधित पालकमंत्री आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करावा मंत्रीपद हे फक्त मिरवण्यासाठी नाही. अस म्हणत अजित पवारांनी एकप्रकारे इशाराच दिला.
हेही वाचा…“शासन आपल्या दारी, पैसे उधळतंय वाऱ्यावरी, मोर्चेकरी दारावरी, सरकार झाडतंय बंदोबस्ताच्या फैरी”
कॅबिनेट बैठक होण्याआधीच विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टिकास्र सोडलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे कोणत्या योजना आणणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून होतं. यामध्ये मराठवाड्यातील ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडणी करण्यात येणार असून यासाठी २८२ निधी जाहिर केला आहे. त्याचबरोबर पुणे-संभाजीनगर मार्गावर इंटेलिंज्सट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम बसवण्यात येणार असून त्यासाठी १८८ कोटींची तरतुद करण्यात आली आहे. तसेच १५० कोटी रूपये पैठणमधील संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित करण्यासाठी देण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने म्हटलं आहे.
हेही वाचा…“तुम्ही अडीच वर्ष माशा मारत होतात का ?”, फडणवीसांचा ठाकरेंना खोचक सवाल
दरम्यान, वैयक्तिक बचत गट शेतकरी उत्पादक कंपनी किमान ५ आणि कमाल १० टक्के दुधाळ जनावरे वाटण्यात येणार आहे. त्याचबरोबर ३१ रस्त्यांची सुधारणांसाठी प्रत्येकी १० हजार कोटी, म्हणजे एकूण ३०० कोटींची योजना, नांदेडमध्ये गोदावरी घाट, साबरमती नदीच्या धर्तीवर रिव्हर फ्रंट म्हणून विकसित करण्यासाठी १० कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. मराठवाड्यातील ३०० कि.मी. लांबीच्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी २ हजार ४०० कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. या सर्वांचा मिळून एकूण ५९ हजार कोटींचं पॅकेज राज्य सरकारकडून देण्यात आलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मुख्यमंत्री आले आणि गेले, ‘कोट्यावधी रूपयांचा झाला’ चुराडा, कॅबिनेट बैठक चर्चेत
हेही वाचा…“फडणवीसांना घडवण्यात माझा मोठा वाटा, मात्र नंतरच्या काळात फडणवीसांनी कुरघोडी केली”
“अमोल मिटकरींना निरमा पावडर अन् दुध गिफ्ट पाठवणार,” मिटकरी विरोधात रोहित पवार गट आक्रमक
हेही वाचा…मोठी बातमी…! सरकारकडून छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव शहरांचं नामकरण, परिपत्रकही काढलं
हेही वाचा…“तर केंद्रीय मंत्र्यांच्या दारासमोर कांदे, टोमॅटो फेकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही”, ‘या’ संघटनेने दिला सरकारला इशारा