मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या शपथविधी नंतर आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू आहे. यादरम्यान भाजपच्या काही आमदारांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याच्या नावाखाली 100 कोटींची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यावरून भाजपचे नेते सत्तेच्या हव्यासापायी कोणत्याही थराला जाऊ शकतात हे सिद्ध होते, असे म्हणत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला.
मोठी बातमी.. ! ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे न्यायालयाचे आदेश
महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रीपद देण्याच्या मोबदल्यात १०० कोटी रुपयांची मागणी करून राहुल कुलसह ३ भाजपा आमदारांची फसवणूक केल्याप्रकरणी खंडणी विरोधी सेलने ४ आरोपींना अटक केली. रियाझ शेख, योगेश कुलकर्णी, सागर संगवई आणि जाफर उस्मानी अशी आरोपींची नावे आहेत. भाजपाच्या तीन आमदारांची अशा प्रकारे फसवणूक होणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. कारण या लोकांसाठी राजकारण हा एक धंदा आहे. समाजकारणाशी यांचा चिमूटभर संबंध नाही. ते १०० कोटी काय, १००० कोटीसुद्धा मंत्रीपदासाठी खर्च करतील. असंही ते म्हणाले.
“आम्हाला दुसऱ्याच्या घरात झाकून पाहण्याची सवय नाही”; नाना पटोलेंचा बोंडेंना प्रत्युत्तर
मुंबई पोलिसांना हीच विनंती आहे की उरलेल्या दोन “सन्माननीय “आमदारांची नावे देखील जाहीर करावी कारण या भावी मंत्र्यांचा उचीत सत्कार जनतेस करता येईल. यासोबतच कोणत्या केंद्रीय मंत्र्याशी भेट घडवून त्यांना मंत्रीपद मिळणार होते हेसुद्धा उघड करण्यात यावे. कारण ज्याप्रमाणे राजस्थानमध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांनी ऑपरेशन लोटस घडवून आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आणि मोदी सरकारला गौरवित करण्याचे काम केले तोच “सन्मान” यांनाही मिळू दे. असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
“आम्हाला दुसऱ्याच्या घरात झाकून पाहण्याची सवय नाही”; नाना पटोलेंचा बोंडेंना प्रत्युत्तर
याबाबत राहुल कुल आणि जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमची कोणत्याही प्रकारची फसवणुक झालेली नाही. पहिल्यांदा फोन आल्यानंतर ही व्यक्ती बनावट असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याशी संपर्क केला. त्यांनी पोलीस आयुक्तांना याबाबत कल्पना दिली. गुन्हे शाखेला सुचना दिल्यानंतर आम्ही संबंधीत व्यक्तीला बोलावले. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं, असं राहुल कुल यांनी सांगितले.
Read also
- “शेवटी करून दाखवलं, ओबीसी आरक्षणाची लढाई आम्ही जिंकलो”
- “आता आरक्षण आमच्यामुळेच मिळालं, असे ढोल मविआ पिटू लागलेत”
- संजय पांडे यांच्यानंतर आता राऊत, परब यांचा नंबर; नवनीत राणांचं सुचक वक्तव्य
- “ओबीसींना राजकीय आरक्षणाबाबत मविआ सरकारला यश आलं”; रोहित पवार
- “ओबीसी आरक्षणाचा आमच्या महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला”; देवेंद्र फडणवीस