मुंबई : माझ्या जन्मापासून ते आजतागायत कॉंग्रेस पक्षाचं काम प्रमाणिकपणे केले आहे. पक्षाने मला मोठे केलं आहे, परंतु मी देखील पक्षाला मोठं करण्याचं काम केलं आहे. त्यामुळे मला अन्य पर्याय देखील बघायला पाहिजे. त्यामुळेच मी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. तसेच येत्या दोन ते तीन दिवसात माझी राजकीय भूमिका स्पष्ट करणार अशी प्रतिक्रिया राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी दिली आहे. यातच अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक कॉंग्रेसचे नेते जाणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये मुंबईतील कॉंग्रेसचे नेते भाई जगताप यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…अशोक चव्हाणांचा कॉंग्रेस पक्षाला राम राम, नाना पटोलेंनी कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनाही दिला ‘हा’ इशारा
भाई जगताप देखील कॉंग्रेस सोडून जाणार अशी चर्चा सुरू आहे. त्यावर माझी शेवटची शोभा यात्रा कॉंग्रेस पक्षाच्या तिरंग्या झेंड्यातूनच निघेल याची सर्वांनी खात्री बाळगा. असं भाई जगताप यांनी म्हटले आहे. तसेच भाई जगताप कॉंग्रेस सोडणार अश्या वावड्या काही नतद्रष्ट पसरवत आहेत. त्यांनी माझ्या विद्यार्थी दशेपासून खांद्यावर घेतलेला हा कॉंग्रेसचा तिरंगा मी कधीही खाली ठेवणार नाही. असे भाई जगताप यांनी म्हटले.
हेही वाचा…राजीनामा दिल्यानंतर कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाणांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले….
दरम्यान, पद, लालच आणि फायद्याकरीता माझा पिंड बनलेला नाही. आणि मी कोणाच्या बापाला घाबरतही नाही. अनेक वादळ आली आणि गेली, कॉंग्रेस कोणीही संपवू शकलं नाही आमि कोणाच्याने संपणारही नाही. कॉंग्रेस पक्षाला गत वैभव पुन्हा मिळवून देऊ त्याकरिता प्रचंड कष्ट घेऊ. असेही त्यांनी सांगितले.
भाई जगताप काँग्रेस सोडणार अश्या वावड्या काही नतद्रष्ट पसरवत आहेत…
मी त्यांना सांगू इच्छितो की माझ्या विद्यार्थी दशेपासून खांद्यावर घेतलेला हा काँग्रेस चा तिरंगा मी कधीही खाली ठेवणार नाही..
पद, लालच आणि फायद्याकरिता माझा पिंड बनलेला नाही.. आणि मी कोणाच्या बापाला घाबरतही…
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) February 12, 2024
READ ALSO :
“श्रेय वादाची लढाई नाही!”धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पावरून कॉंग्रेस अन् भाजपमध्ये जुंपली
हेही वाचा…अशोक चव्हाणांचा राजीनामा..! परंतु कॉंग्रेसने ‘या’ निवडणुकीत भाजपला पाणी पाजलं, एकच चर्चा
हेही वाचा…“भाजपाला आता कुत्रासुद्धा मत देणार नाही , कारण..,” उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…“आगे आगे देखो होता है क्या..” फडणवीसांच्या विधानानंतर भाजप नेत्यांची धाकधुक वाढली, कुणाचं तिकीट, तर कोणाची खरकटी…?
हेही वाचा…कॉंग्रेसमधून राजीनामा का दिला ? अशोक चव्हाणांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले….