मुंबई : माझ्या जन्मापासून ते आजतागायत कॉंग्रेस पक्षाचं काम प्रमाणिकपणे केले आहे. पक्षाने मला मोठे केलं आहे, परंतु मी देखील पक्षाला मोठं करण्याचं काम केलं आहे. त्यामुळे मला अन्य पर्याय देखील बघायला पाहिजे. त्यामुळेच मी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. तसेच येत्या दोन ते तीन दिवसात माझी राजकीय भूमिका स्पष्ट करणार अशी प्रतिक्रिया राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा….अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल ? चव्हाणांचा प्रमुख विरोधक खासदार प्रतापराव चिखलीकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू. असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.
हेही वाचा…कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी आमदारकीचा दिला राजीनामा ? राजकीय हालचाली वाढल्या
दरम्यान, कॉंग्रेस पक्षाचा विधानसभा सदस्यचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना भेटून दिला आहे. त्यानंतर कॉंग्रेसचा देखील राजीनामा दिला आहे. कॉंग्रेसमध्ये असतांना प्रमाणिकपणे काम केलं आहे. त्यामुळे मला कुणावरही टिका करायची नाही. यापुढची राजकीय दिशा येत्या दोन ते तीन दिवसात घेणार आहे. भाजपमधून राज्यसभेच्या खासदारकीची उमेदवारी मिळणार म्हणून भाजपमध्ये जाणार आहे का ? यावर ते म्हणाले की मला भाजपची कार्यप्रणाली अद्यापही माहिती नाही. भाजपमध्ये जाण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. त्यामुळे दोन दिवसात माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेन, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेसमधून बाहेर जाण्याचा निर्णय का घेतला ? यावर बोलतांना ते म्हणाले की, कोणत्याही गोष्टीला कारण हे असलचं पाहिजे असे काही नाही. मी माझ्या जन्मापासून आजतागायत कॉंग्रेस पक्षाचं काम केलं आहे. मला वाटतं की अन्य पर्याय पाहिले पाहिजे. त्यामुळेच मी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. मला कुठलीही पक्षांतर्गत जाहीर वाच्यता काढायची नाही. तो माझा स्वभाव नाही. मला अद्यापही कुणीही संपर्क साधला नाही. तसेच मी पण देखील कोणत्याही आमदाराशी संपर्क केला नाही. असेही ते म्हणाले.
काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही… pic.twitter.com/7hh2U7nHg2
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 12, 2024
READ ALSO :
हेही वाचा…राजीनामा दिल्यानंतर कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाणांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले….
हेही वाचा…“महाराष्ट्रात सध्या कॉंग्रेस पक्षाचा हिरो, मला कशाचीच भीती नाय,” कॉंग्रेसच्या ‘या’ आमदारांचं मोठं विधान
हेही वाचा…कॉंग्रेसचा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी दोन दिग्गज मैदानात, राज्यात हालचालींना वेग, अशोक चव्हाणांचा राजीनामा
हेही वाचा….“राम मंदिर झालं, आता श्रीकृष्णाचं मंदिर झाल्याशिवाय विराम नाही,”
हेही वाचा…काँग्रेसला मोठे खिंडार? अशोक चव्हाणांसोबत जाण्यास कॉंग्रेसची मोठी फौज तयार, पाहा यादी