पुणे : अयोध्येत प्रभू श्रीरा रामाचं मंदिर होवो, ही आपल्या सर्वांचीच इच्छा होती. ती पुर्ण झाली. आता मथुरेत प्रभू श्रीकृष्णाचं मंदिर झाल्याशिवाय आम्ही विराम घेणार नाही. बाबा विश्वनाथांनी तर स्वत: च विषय मार्गी लावून टाकला. आता प्रभू श्री कृष्णसाठी आपली जबाबदारी आहे. असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल गीताभक्ती अमृत महोत्सवात केले. आळंदी याठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील हजेरी लावली. त्यावेळी फडणवीस बोलत होते.
हेही वाचा…महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा सुटेना, महाराष्ट्राच्या प्रभारीला घेऊन कॉंग्रेसच्या नेत्यांनी गाठलं थेट मातोश्री
पुढे बोलतांना ते म्हणाले की, मंदिरानिर्मितीतून आपली जुनी प्राचीन सनातन संस्कृती पुनर्स्थापित करण्याची आमची धारणा आहे. समर्थ रामदारांचा आम्ही काय कोणाचे खातो तो श्रीराम आम्हाला देतो. या वचनाचा आधार देत त्यांनी प्रभू श्रीराम मंदिर उभारण्यासाठी सरकारी निधीची गरज लागली नसल्याचेही त्यांनी सांगितले. जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकरे, हा अभंग सांगत संतांचे मोठे कष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…“आमच्या कार्यकर्त्यांचं रक्त सांडलंय, रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब आम्ही वसूल करणार”
दरम्यान, महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. कारण या मातीत पुज्य संतांचे सान्निध्य प्राप्त झाल्याचे सांगत योगी आदित्यनाथ यांनी समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविले असे विधान केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपुर्ण भारतभर चेतना निर्माण केली. त्यांनी औरंगजेबाच्या सत्तेला आव्हान दिले. तेव्हापासून औरंगजेबाला आतापर्यंत कुणीही विचारत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झालाय”, पंकजा मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे ?
हेही वाचा..शरद पवारांनी भाजपची वाचली कुंडली, शरद पवारांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…बारामतीत पवार कुटुंबात संघर्ष पेटला, भावी खासदार म्हणून लागलेल्या ‘सुनेत्रा पवारां’च्या बॅनरवर शाईफेक
हेही वाचा…“तर महाराष्ट्र असाच आणखी खाली सरकत राहील”, विरोधकांनी राज्य सरकारला दिला कडक इशारा
हेही वाचा..महिन्याआधी भाजपमध्ये प्रवेश, लोकसभेची दावेदार, केतकी पाटलांचा रावेरमध्ये कार्यक्रमांचा धडका