बीड : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून भाजपने गाव पातळीवर गाव चलो अभियान सुरू केलं आहे. या अभियानांतर्गत भाजपच्या सचिव पंकजा मुंडे यांनी बीड तालुक्यातील नारायण गड येथे नगद नारायणचे दर्शन घेऊन अभियानाची सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी पौंडूळ गावात पंकजा मुंडेनी रात्रीचा मुक्काम करत गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…“आमच्या कार्यकर्त्यांचं रक्त सांडलंय, रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब आम्ही वसूल करणार”
गेल्या अनेक वर्षांपासून पंकजा मुंडे भाजपवर नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. तशी नाराजी देखील वारंवार पंकजा मुंडे यांनी व्यक्त करून दाखविली आहे. यातच आता पौंडूळ गावात त्यांनी एक विधान केलं आहे. राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला आहे, माझा वनवास झाला, तुमचं प्रेम पाहण्यासाठीच हे सर्व झालं आहे. मला तुम्ही वाघीण म्हणालात. मी वाघिणी सारखीच जगेन, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील भावना गावकऱ्यांसोबत व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा…बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात कुटुंबातीलच उमेदवार ? सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबाबत अजित पवार काय म्हणाले…
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्यासोबत नेमका दगाफटका कुणी केला ? याची चर्चा आता राजकारणात सुरू झाली आहे. यातच आता २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. पंकजा मुंडे यांना भाजपकडून अनेक वेळा अन्याय झाला आहे. त्यामुळे त्यांना यावेळी राज्यसभेची उमेदवारी पक्की दिली जाणार ? अशी चर्चा सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा..शरद पवारांनी भाजपची वाचली कुंडली, शरद पवारांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…बारामतीत पवार कुटुंबात संघर्ष पेटला, भावी खासदार म्हणून लागलेल्या ‘सुनेत्रा पवारां’च्या बॅनरवर शाईफेक
हेही वाचा…“तर महाराष्ट्र असाच आणखी खाली सरकत राहील”, विरोधकांनी राज्य सरकारला दिला कडक इशारा
हेही वाचा..महिन्याआधी भाजपमध्ये प्रवेश, लोकसभेची दावेदार, केतकी पाटलांचा रावेरमध्ये कार्यक्रमांचा धडका
हेही वाचामहाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा सुटेना, महाराष्ट्राच्या प्रभारीला घेऊन कॉंग्रेसच्या नेत्यांनी गाठलं थेट मातोश्री