पुणे : भाजपच्या विचारांच्या विरूद्ध कोणी वेगळी भूमिका घेत असेल तर सत्तेचा गैरवापर कसा केला जातो हे आम्ही पार्लमेंटमध्ये पाहिलं आहे. अलीकडे काही नवीन शब्द महाराष्ट्र आणि देशाला माहित झाले. याआधी ईडी हा शब्द माहीत नव्हता आता तो शब्द देशाच्या कानाकोपऱ्यात पोहाचला. २००५ ते २०२३ या काळात ईडीचा गैरवापर किती झाला ? तर फक्त ईडीच्या ६ हजार केसेस रजिस्टर झाल्या. त्याची चौकशी केल्यानंतर सत्यावर आधारित केसेस २५ निघाल्या. यापैकी ज्यांना शिक्षा झाली असे फक्त दोनच लोक होते. या कामासाठी ७०४ कोटींचे ईडीचे बजेट होते. एवढे पैसे खर्च करून त्यांनी एवढा उपद्याप केला. हे करत असाना ईडीचा कोणाच्या मागे लावली ? या काळात १४७ लोकांची चौकशी झाली. त्यामध्ये ७५ टक्के नेते हे विरोधी पक्षाचे होते. भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांनी कोणावर ईडीचा हत्यार वापरलं? असा सवाल करत शरद पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
हेही वाचा…बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात कुटुंबातीलच उमेदवार ? सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबाबत अजित पवार काय म्हणाले…
गेल्या ८ वर्षामध्ये १२१ नेत्यांवर कारवाई केली. त्यात १ मुख्यमंत्री, १ माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षातल्या सरकारमधले १४ मंत्री, २४ खासदार, २१ आमदार, ७ माजी खासदार व या सगळ्यांमध्ये ईडीने ज्यांच्यावर कारवाई केली. त्यांच्यामध्ये एकाही भाजप नेत्याचे नाव नाही. याचा अर्थ काय ? काही लोकांची आधी चौकशी झाली होती. व हे सत्तेवर आल्यानंतर ही चौकशी थांबवायचा निकाल त्यांनी घेतला. म्हणून आज अधिकारांचा गैरवापर फक्त लोकशाहीमद्ये त्यांच्या मनाच्या विरूद्ध जे काही बोलतात त्यांच्या विरूद्ध वापरणे हा एक कलमी कार्यक्रम आजच्या राज्यकर्त्यांनी केलेला असल्याचा हल्लाबोल देखील शरद पवारांनी भाजपवर चढवला.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय,” उद्धव ठाकरेंची टिका फडणवीसांना झोंबली
दरम्यान, केंद्रातली सत्ता एका पक्षाच्या हातात असून उत्तरेकडीलही सर्व राज्यांच्या सत्ता त्यांच्या हातात आहे. त्यांच्या सत्तेचा वापर त्यांची जी काही धोरणे आहेत. ती धोरणे समाजात ऐक्याला धक्का देणारी आहे. त्या सर्वांचा पुरस्कार आज त्या ठिकाणी केला जातो. कालच लोकसभेचे काम संपले. प्रधानमंत्र्यांचे भाषण तुम्ही पाहिले असेल. काम सांगितलं काही नाही. परंतु इंदिरा गांधींवर, जवाहरलाल नेहरूंवर हल्ला. ज्या व्यक्तीने व कुटुंबाने स्वातंत्र्याच्या आंदोलनात अनेक वर्ष तुरूंगात काढली. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर त्याचा अर्थ लोकशाहीच्या माध्यमातून सांगण्यासाठी प्रयत्न केले व लोकशाही प्रणित शासन दिलं अशा लोकांवर व्यक्तीगत हल्ले करून काय साधले. ? असा सवाल देखील त्यांनी केला.
READ ALSO :
हेही वाचा…बारामतीत पवार कुटुंबात संघर्ष पेटला, भावी खासदार म्हणून लागलेल्या ‘सुनेत्रा पवारां’च्या बॅनरवर शाईफेक
हेही वाचा…“तर महाराष्ट्र असाच आणखी खाली सरकत राहील”, विरोधकांनी राज्य सरकारला दिला कडक इशारा
हेही वाचा..महिन्याआधी भाजपमध्ये प्रवेश, लोकसभेची दावेदार, केतकी पाटलांचा रावेरमध्ये कार्यक्रमांचा धडका
हेही वाचामहाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा सुटेना, महाराष्ट्राच्या प्रभारीला घेऊन कॉंग्रेसच्या नेत्यांनी गाठलं थेट मातोश्री
हेही वाचा“आमच्या कार्यकर्त्यांचं रक्त सांडलंय, रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब आम्ही वसूल करणार”