रावेर : कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या भाजपच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा केतकी पाटील राजकारणात आता चांगल्याच सक्रीय झाल्या आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ट नेते आणि माजी मंत्री उल्हास पाटील यांच्यासोबत केतकी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपने त्यांच्यावर महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. त्यानंतर आता रावेर लोकसभा मतदारसंघात त्यांनी जनतेशी संवाद साधण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांचे चिरंजीवांनी दिल्लीच्या तख्तासमोर अक्षर:क्ष लोळण घातली, छत्रपतींचा केला अपमान”
यातच रावेर लोकसभा मतदारसंघातील तथा मलकापुर विधानसभा क्षेत्रातील मलकापुर शहरात त्यांनी भातृ मंडळ चाळीस बिघा येथे भाजप महिला मोर्चा तर्फे आयोजित नारी शक्ती वंदना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी माजी आमदार चैनसुख संचेती, रावेर लोकसभेचे अध्यक्ष अमोल जावळे, सचिन देशमुख, उमाताई तायडे. सारिका डागा, तसेच इतर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यातच केतकी पाटील यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट दिले जाणार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे केतकी पाटील आता आपल्या विविध कार्यक्रमांचा धडका लावला आहे. अशीही चर्चा आहे.
हेही वाचा…निवडणुकांआधीच मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला ताप वाढवणारा सर्व्हे, एकनाथ शिंदेंची लोकप्रियता घटली?
दरम्यान, मलकापुर आणि नांदुरा विधानसभेतील महिलांसाठी हा समारंभ म्हणजे एक आनंद पर्वणीच ठरल्याची प्रतिक्रिया केतकी पाटील यांनी दिली. तसेच या कार्यक्रमात महिलासोबत कौटुंबिक संवाद साधून त्यांचे सुख: दुख वाटण्याचा प्रयत्न केला. २०१४ नंतर महिलांच्या जीवनामध्ये झालेले सामाजिक व्यावसायिक बदल हे खरंच वाखाणण्याजोगे आहेत. उज्वला योजना असेल किंवा जनधन योजनेतील बँकेची खाते असतील यात आज महिला आग्रणी आहेत. याचबरोबर केंद्र सरकारने योजलेल्या अनेक योजनांचा फायदा ग्रामीण भागातील महिलांना होत आहे यातून त्यांचे आयुष्य हे समृद्ध होत असल्याच्याही त्या म्हणाल्या.
READ ALSO :
हेही वाचामहाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा सुटेना, महाराष्ट्राच्या प्रभारीला घेऊन कॉंग्रेसच्या नेत्यांनी गाठलं थेट मातोश्री
हेही वाचा“आमच्या कार्यकर्त्यांचं रक्त सांडलंय, रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब आम्ही वसूल करणार”
हेही वाचा…बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात कुटुंबातीलच उमेदवार ? सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबाबत अजित पवार काय म्हणाले…
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय,” उद्धव ठाकरेंची टिका फडणवीसांना झोंबली
हेही वाचा..“राज्य सरकारला ताबोडतोब बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावा,” कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी