मुंबई : मागील काही महिन्यांपासून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बदलली आहेत. गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटनांमुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे. तर सत्ताधारी मंत्र्यांसोबत काही गुंडाचे फोटो देखील झळकले आहेत. तर राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी देखील याबाबत एक पत्र जनतेला लिहिलं होतं. याच संपुर्ण घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी विरोधकांनी आज राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा…“गुंडगिरीचं हे घोंगावणारं वादळ सामान्यांच्या आणखी जवळ ! आता गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायलायच हवा”
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अतुल लोंढे , नसीम खान आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यावेळी उपस्थित होते. तसेच राज्यात ढासळलेली कायदे व्यवस्था आणि कायदे व्यवस्ता आणि यावर नियमंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारला बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी यावेळी त्यांनी राज्यपालांना निवेदनामार्फत करण्यात आली आहे.
महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत, थोर समाजसुधारकांची भूमी आहे. महाराष्ट्राला मोठी परंपरा लाभलेली आहे, या राज्याने देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतीक क्षेत्रातही महाराष्ट्राने मोठी प्रगती केलेली आहे. देशात आघाडीचे राज्य म्हणून महाराष्ट्राचा नाव लौकिक आहे. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीतही महाराष्ट्र उत्तम राज्य म्हणून गणले जात होते. परंतु अशा महान महाराष्ट्रातील सामाजिक विण विस्कळीत करण्याचे, राज्यातील शांतता भंग करण्याचे काम केले जात असून त्यातून कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…जागा शिवसेनेची, दावा राष्ट्रवादीचा, लोकसभेच्या उमेदवारासाठी ठराव मंजूर
तसेच गेल्या एक महिन्यात महाराष्ट्रातील घडलेल्या घटना चिंताजनक आहेत. शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून निर्घुण हत्या करण्यात आली. पुण्यात पत्रकार निखील वागळे यांच्यावर पोलिसांच्या उपस्थितीत प्राणघातक हल्ला करण्यात आला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये दोन लोकांवर गोळीबार केला. २२ जानेवारी रोजी मीरा रोड येथे धार्मिक तणाव, सरकारने बुलडोझर चालवून गरिबांची घरे तोडली. जळगावातील भाजपचे नगरसेवक मोरे यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. यवतमाळ शहरात भर दिवसा एका तरुणाची हत्या करण्यात आली. लहान लहान मुलांकडे शस्त्रे सापडत आहेत. अवैध शस्त्रांचा मोठा साठा राज्यात येत आहे. राज्यात महिला सुरक्षित नाहीत, लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत हे अत्यंत गंभीर आहे. राज्यातले सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे त्यामुळे ते बरखास्त करावे अशी नाना पटोले यांनी केली.
महामहिम @maha_governor जी,
महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत, थोर समाजसुधारकांची भूमी आहे. महाराष्ट्राला मोठी परंपरा लाभलेली आहे, या राज्याने देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक,… pic.twitter.com/Ly52BV9N3Z— Nana Patole (@NANA_PATOLE) February 10, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांचे चिरंजीवांनी दिल्लीच्या तख्तासमोर अक्षर:क्ष लोळण घातली, छत्रपतींचा केला अपमान”
हेही वाचा…निवडणुकांआधीच मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला ताप वाढवणारा सर्व्हे, एकनाथ शिंदेंची लोकप्रियता घटली?
हेही वाचा…“त्या दोघांनाही मारण्याची सुपारी आणखी कुणी दिली होती का ?”उद्धव ठाकरेंना उपस्थित केला सवाल
हेही वाचा…फडतूस-कलंक हे फार सौम्य शब्द झाले, महाराष्ट्राला ‘मनोरुग्ण’ गृहमंत्री लाभलाय का? ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं
हेही वाचा..पुण्यात मोठा राडा..! भाजपच्या कार्यकर्त्यांकडून महिलांना मारहाण अन् अर्वाच्च शिवीगाळ, सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या…