पुणे : पुण्यामध्ये निर्भय बनो कार्यक्रमासाठी येत असलेल्या पत्रकार निखील वागळे यांच्या गाडीवर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पोलिस बंदोबंदात प्राणघातक हल्ला करण्यात आला. निर्भय बनो सभा उधळून लावण्याचा इशारा दिल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली. यावेळी पुण्यात काल मोठा राडा झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून निखिल वागळे यांच्या गाडीवर दगडफेक करत गाडीच्या काचा फोडल्या. तसेच निखील वागळे यांच्यावर अंडी, शाई देखील फेकण्यात आली. या अशा संपुर्ण राड्यात निखील वागळे कसबसे बचावले. या घटनेनंतर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांनी केली आहे.
हेही वाचा…“तेव्हा पटोले खासदारकीच्या खुर्चीला लाथ मारून पंतप्रधानांच्या तोंडावर राजीनामा फेकून आले”, कॉंग्रेसने भाजपला पुन्हा डिवचलं
गुंडगिरीचं हे घोंगावणारं वादळ सामान्यांच्या आणखी जवळ आलं आहे. सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सलग एक आठवड्यापासून राज्यात गुन्हेगारी कृत्यांचा गदारोळ माजला आहे. २ लोकप्रतिनिधींवर जीवघेणे हल्ले करण्यात आले आहेत. शस्त्रांचा अत्यंत चुकीच्या पद्धतीने वापर करत लोकशाहीला काळिमा फासण्याचे काम केले गेले आणि आता मात्र थेट महाराष्ट्रातील पत्रकार निखील वागळे यांच्यावर हल्ला केला गेला. तोही भाजपच्या कार्यकर्त्यांकडून. लोकशाहीचे लचके तोडण्याची भाजप एकही संधी सोडतांना दिसत नाही. आता मात्र पाणी डोक्यावरून गेलं आहे. आता आम्हाला नुसतं उत्तर नकोय. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायलायच हवा. अशी मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा…मोदींच्या कार्यकाळात आतापर्यंत कुणाकुणाला भारतरत्न ? कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्यांचा समावेश
दरम्यान, अलिकडेच अभिषेक घोसाळकर गोळीप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील. असं वक्तव्य केलं होतं. त्याचाच धागा पकडत रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील, असं विधान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मला त्यांना विचारायचंय पत्रकार निखिल वागळे यांची गाडी फोडणारे आणि त्यांच्यावर हल्ला करणारेही कुत्रेच होते का ? कुत्रे नसतील आणि भाजपचे कार्यकर्ते असतील तर आता तरी आपण राजीनामा देणार का ? असा सवाल देखील रोहित पवार यांनी फडणवीस यांना केला आहे.
गुंडगिरीचं हे घोंगावणारं वादळ सामान्यांच्या आणखी जवळ !!!
सत्ताधाऱ्यांची हुकुमशाही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सलग एक आठवड्यापासून राज्यात गुन्हेगारी कृत्यांचा गदारोळ माजला आहे. २ लोकप्रतिनिधींवर जीवघेणे हल्ले करण्यात आले, शस्त्रांचा अत्यंत चुकीच्या पद्धतीने वापर करत लोकशाहीला… pic.twitter.com/FHZZFEHqfH
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 9, 2024
READ ALSO :
हेही वाचा…जागा शिवसेनेची, दावा राष्ट्रवादीचा, लोकसभेच्या निवडणुकाकरिता उमेदवारासाठी ठराव मंजूर
हेही वाचा…“काल मृत्यू दारात उभा राहिला होता, केवळ तुमच्या प्रेमामुळे वाचलो”, मोठ्या राड्यानंतर निखील वागळेंची पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…“मूर्खपणाचा डोंगर, संजय बांगर !” तर तुम्ही जेवण करू नका, बांगरांचा लहान मुलांना अजब सल्ला, विरोधकांचा हल्लाबोल
हेही वाचाभुजबळांची ह’त्या कशी अन् कधी करायची ? ‘त्या’ हॉटेलमध्ये शिजला कट, पत्रात धक्कादायक गोष्टी उघड
हेही वाचा…“निखिल वागळेंची गाडी फोडणारे आणि हल्ला करणारेही कुत्रेच होते का ?” रोहित पवारांचा रोखठोक फडणवीसांना सवाल