मुंबई : आगामी लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याची जय्यत तयारी देशातील सर्वच पक्षातील नेत्यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी इंडीया आघाडी स्थापन केली असून प्रत्येक राज्यात भाजपच्या विरोधात रणनिती आखली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजप देखील निवडणुकीची जोरदार तयारी करतांना दिसत आहेत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरवरून भारतरत्न पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये कॉंग्रेसचे नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारे डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भाररत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एका महिन्यात तब्बल पाच व्यक्तींना मोदींनी भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. तर मोदींच्या कार्यकाळात आतापर्यंत जवळपास 9 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिला आहे.
हेही वाचा…क्रुर, गलिच्छ आणि निर्दयी! फडणवीसांच्यावर प्रत्युत्तरावर ठाकरे गटाचा पलटवार
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप विरूद्ध कॉंग्रेस अशी लढत अटळ आहे. यातच कॉंग्रेसचा मतदार आपल्याकडे वळविण्याकरिता मोदींनी कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्यांना भारतरत्न दिल्याचा आरोप केला जात आहे. यामध्ये शिक्षणतज्ज्ञ, स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेसचे एकेकाळचे अध्यक्ष मदन मोहन मालवीय, माजी राष्ट्रपती आणि काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी, काँग्रेसचे नेते, देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचा यामध्ये समावेश आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा लोकसभेसाठी पहिला ‘उमेदवार’ ठरला,” जयंत पाटलांनी केली मोठी घोषणा
दरम्यान, पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे. तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं. देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल. अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे.
मोदींच्या कार्यकाळात आतापर्यंत कुणाकुणाला भारतरत्न ?
१ ) शिक्षणतज्ज्ञ, स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेसचे एकेकाळचे अध्यक्ष मदन मोहन मालवीय
२ ) माजी पंतप्रधान आणि भाजपा नेते अटल बिहारी वाजपेयी
३ ) माजी राष्ट्रपती आणि काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी
४ )आसामी गायक आणि संगीतकार भूपेन हजारिका
५ ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते नानाजी देशमुख
६ ) बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि ‘जननायक’ कर्पूरी ठाकूर
७ ) काँग्रेसचे नेते, देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव
८ ) माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह
९ ) कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारे डॉ. एम.एस. स्मामीनाथन
READ ALSO :
हेही वाचा…“गुंडाराज बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा”, नाना पटोलेंची मोठी मागणी
हेही वाचा…“हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न पुरस्कार द्या,” राज ठाकरेंची मोदींकडे मागणी
हेही वाचा…बागेश्वर बाबाला फडणवीसांनी दिली तंबी ? वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सुनावलं, रोहित पवारांचं विधान
हेही वाचा…मॉरिसने घोसाळकरांचा काटा का काढला ? पोलिसांनी ताब्यात घेतलेले मेहुल पारिख अन् रोहित साहू नेमके कोण?
हेही वाचा…“चौधरी चरणसिंह, पी.व्ही. नरसिंह राव आणि डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार,” मोदींनी केली मोठी घोषणा