मुंबई : काल मुंबईत ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर महाराष्ट्रात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या असून यामध्ये राजकीय नेते टार्गेट केले जात आहेत. यातच सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांसोबत गुंडाचे काही फोटो देखील झळकले आहेत. यावरूनच नाना पटोले यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा लोकसभेसाठी पहिला ‘उमेदवार’ ठरला,” जयंत पाटलांनी केली मोठी घोषणा
महाराष्ट्रात कायद्याचे तीन तेरा वाजले आहेत. गुडांना कसलीच भीती राहिलेली नाही. कल्याणमध्ये पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार, जळगाव, यवतमाळमधील गोळीबाराच्या घटनानंतर आता मुंबईत माजी नगरसेवकाची हत्या अशा घटना वाढत आहेत. ही महाराष्ट्राची अत्यंत गंभीर व चिंतेची बाब आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगला तसेच मंत्रालयात गुडांचा वावर बनदक्कितपणे सुरू आहे. तडीपार गुडांना राजाश्रय पोलिस दलामधील राजकीय हस्तक्षेप व दबावामुळे पोलिसही हतबल झाले आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक असून हे गुंडाराज बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
हेही वाचा…मॉरिसने स्वत:वर गोळ्या का घातल्या? धक्कादायक माहिती समोर
दरम्यान, काल झालेल्या घटनेनंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली. तर राज्यात कायद्याचा धाक राहिला नसून गुंडांच राज्य आलं आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे. परंतु सरकार यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तयार नसल्याचं दिसत आहेत. अशा घटनांमुळे राज्यात आता सगळीकडे संंताप आणि चीड व्यक्त केली जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न पुरस्कार द्या,” राज ठाकरेंची मोदींकडे मागणी
हेही वाचा…बागेश्वर बाबाला फडणवीसांनी दिली तंबी ? वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सुनावलं, रोहित पवारांचं विधान
हेही वाचा…मॉरिसने घोसाळकरांचा काटा का काढला ? पोलिसांनी ताब्यात घेतलेले मेहुल पारिख अन् रोहित साहू नेमके कोण?
हेही वाचा…“चौधरी चरणसिंह, पी.व्ही. नरसिंह राव आणि डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार,” मोदींनी केली मोठी घोषणा
हेही वाचा…क्रुर, गलिच्छ आणि निर्दयी! फडणवीसांच्यावर प्रत्युत्तरावर ठाकरे गटाचा पलटवार