मुंबई : महाराष्ट्रात कायद्याचे तीन तेरा वाजले आहेत. गुडांना कसलीच भीती राहिलेली नाही. कल्याणमध्ये पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार, जळगाव, यवतमाळमधील गोळीबाराच्या घटनानंतर आता मुंबईत माजी नगरसेवकाची हत्या अशा घटना वाढत आहेत. ही महाराष्ट्राची अत्यंत गंभीर व चिंतेची बाब आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगला तसेच मंत्रालयात गुडांचा वावर बनदक्कितपणे सुरू आहे. तडीपार गुडांना राजाश्रय पोलिस दलामधील राजकीय हस्तक्षेप व दबावामुळे पोलिसही हतबल झाले आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक असून हे गुंडाराज बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यावर आता भाजपने पुन्हा टिका केली असून त्यावर कॉंग्रेसने जोरदार पलटवार केला आहे.
हेही वाचा…“चौधरी चरणसिंह, पी.व्ही. नरसिंह राव आणि डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार,” मोदींनी केली मोठी घोषणा
नाना पटोले यांना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही, कारण तुमचं मविआ सरकार असताना त्यावेळचे गृहमंत्री काय करत होते? त्यांना तुरुंगात जावं लागलं, १०० कोटी वसुली, ॲंटलिया बाँब प्लॅंट प्रकरण, वाझे की लादेन, मनसुख हिरेन प्रकरण महाराष्ट्रातील जनता अजूनही विसरलेली नाही. देवेंद्र फडणवीस हे सक्षम आणि कर्तव्यदक्ष गृहमंत्री आहेत. कुत्रा आणि माणूस याचा फरक त्यांना कळतो पण तुम्हाला फडणवीस द्वेषाचा कावीळ झाल्यामुळे तुम्हाला तो फरक कळणार नाही. महाराष्ट्रात लाचार, हतबल आणि निष्क्रीयतेचं सर्वोत्तम उदाहरण तुम्ही आहात. प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसची झालेली लाचारी आणि हतबलता लोक बघत आहेत. बाकी तुमच्या अकार्यक्षमतेबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनीच अनेकवेळा दिल्लीत जाऊन सांगितलंय. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यापूर्वी स्वतःची कारकीर्द तपासा, म्हणजे कळेल. असं म्हणत भाजपने पटोले यांना डिवचलं आहे.
हेही वाचा…क्रुर, गलिच्छ आणि निर्दयी! फडणवीसांच्यावर प्रत्युत्तरावर ठाकरे गटाचा पलटवार
दरम्यान, नाना पाटोले स्वाभिमानी आहेत, म्हणून तुमच्या शेतकरी विरोधी धोरणाला विरोध करून खासदारकीच्या खुर्चीला लाथ मारून पंतप्रधानांच्या तोंडावर राजीनामा फेकून आले आणि तुम्ही सत्तेसाठी लाचार आहात. म्हणूनच ज्या अजित पवारांवर संपूर्ण आयुष्यभर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्याच मांडीला मांडी लावून दादा-दादा करत खुर्च्या उबवत बसला आहात. तुम्ही लाचार आहात म्हणूनच मुख्यमंत्री पद दिले नाही तरी उपमुख्यमंत्री बनून बसला आहात. तुम्ही अकार्यक्षम आणि हतबल आहात म्हणूनच पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणा-या आमदार गणपत गायकवाडला पक्षातून निलंबीत करू शकत नाहीत. तुम्ही निष्क्रीय आहात म्हणूनच दादर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणा-या आमदार सदा सरवणकर यांच्यावर कारवाई करू शकला नाहीत. तुम्ही सत्तेचे लालची आहात म्हणूनच वेषांतर करून रात्रभर आमदार फोडत फिरत होतात. असा घणाघात कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे.
@Dev_Fadnavis
फडणवीस जी, नाना पाटोले स्वाभिमानी आहेत म्हणून तुमच्या शेतकरीविरोधी धोरणाला विरोध करून खासदारकीच्या खुर्चीला लाथ मारून पंतप्रधानांच्या तोंडावर राजीनामा फेकून आले.
आणि तुम्ही सत्तेसाठी लाचार आहात म्हणूनच ज्या अजित पवारांवर संपूर्ण आयुष्यभर भ्रष्टाचाराचे आरोप केले,… https://t.co/3DZCSeUF5F— Maharashtra Congress (@INCMaharashtra) February 9, 2024
READ ALSO :
हेही वाचा…मोदींच्या कार्यकाळात आतापर्यंत कुणाकुणाला भारतरत्न ? कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्यांचा समावेश
हेही वाचा…“गुंडाराज बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा”, नाना पटोलेंची मोठी मागणी
हेही वाचा…“हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न पुरस्कार द्या,” राज ठाकरेंची मोदींकडे मागणी
हेही वाचा…बागेश्वर बाबाला फडणवीसांनी दिली तंबी ? वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सुनावलं, रोहित पवारांचं विधान
हेही वाचा…मॉरिसने घोसाळकरांचा काटा का काढला ? पोलिसांनी ताब्यात घेतलेले मेहुल पारिख अन् रोहित साहू नेमके कोण?