पुणे : पोलिसांनी चार तास घरात स्थानबद्ध केल्यानंतरही निर्भय बनो सभेसाठी निघालेले ज्येष्ठ पत्रकार निखिल वागले यांच्या गाडीवर भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी दगडफेक, लाठीहल्ला, शाईफेक, अंडीफेकी केली. वागळे बसलेल्या मोटारीवर चार ते पाच ठिकाणी हल्ला झाला. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या संरक्षणामुळे वागळे सभेसाठी पोहचले. तेथूनच त्यांनी तुम्ही आम्हाला कधीही मारू शकता. आम्ही नि: शस्त्र आहोत. पण जोपर्यंत जिवंत आहोत. तोपर्यंत संघर्ष करणार. भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही. अशा शब्दांत अंगार फुंकले. या घटनेवरून आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली.
हेही वाचा…मॉरिसने घोसाळकरांचा काटा का काढला ? पोलिसांनी ताब्यात घेतलेले मेहुल पारिख अन् रोहित साहू नेमके कोण?
अलिकडेच अभिषेक घोसाळकर गोळीप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील. असं वक्तव्य केलं होतं. त्याचाच धागा पकडत रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील, असं विधान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मला त्यांना विचारायचंय पत्रकार निखिल वागळे यांची गाडी फोडणारे आणि त्यांच्यावर हल्ला करणारेही कुत्रेच होते का ? कुत्रे नसतील आणि भाजपचे कार्यकर्ते असतील तर आता तरी आपण राजीनामा देणार का ? असा सवाल देखील रोहित पवार यांनी फडणवीस यांना केला आहे.
हेही वाचा…“चौधरी चरणसिंह, पी.व्ही. नरसिंह राव आणि डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार,” मोदींनी केली मोठी घोषणा
निखील वागळे यांच्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळी हल्ला केला. तेव्हा या हल्ल्यात काही महिला देखील जखमी झाल्या आहेत. त्यावरूनही रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली आहे. शत्रुच्याही सुनेचा साडीचोळी देऊन सन्मान करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात भर दिवसा महिलांच्या अंगावर हात टाकला जात असेल तर स्वत: ला पुरूष म्हणून घेण्याचा थोडाही अधिकार भाजप आणि बळकावलेल्या राष्ट्रवादीतील भेकड गुंडांना नाही. त्यांच्या या गुंडगिरीचा तीव्र निषेध असेही रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र याचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही. या गुंडांशी बेडरपणे दोन हात करणाऱ्या रणरागिनी भक्तीताईसह कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि वंचितचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकशाही प्रेमी नागरिक यांचा अभिमान वाटतो. दोन दिवसांपुर्वी गुंडांची परेड काढणारे पुणे पोलीस आता या गुंडांची परेड कधी काढणार ? असा सवाल देखील रोहित पवारांनी केला आहे.
#निर्भय_बनो कार्यक्रमातील प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲड. असीम सरोदे आणि डॉ. विश्वंभर चौधरी यांच्यावर भाजपाने केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध!
भाजपाची हीच झुंडशाही आपल्याला संपवायचीय!
हे सरकार कुणाचं आहे? कायद्याने चालणारं की भाजपच्या गुंडांचं?@Dev_Fadnavis… pic.twitter.com/LSEh8nbhTM
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 9, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“तेव्हा पटोले खासदारकीच्या खुर्चीला लाथ मारून पंतप्रधानांच्या तोंडावर राजीनामा फेकून आले”, कॉंग्रेसने भाजपला पुन्हा डिवचलं
हेही वाचा…मोदींच्या कार्यकाळात आतापर्यंत कुणाकुणाला भारतरत्न ? कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्यांचा समावेश
हेही वाचा…“गुंडाराज बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा”, नाना पटोलेंची मोठी मागणी
हेही वाचा…“हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न पुरस्कार द्या,” राज ठाकरेंची मोदींकडे मागणी
हेही वाचा…बागेश्वर बाबाला फडणवीसांनी दिली तंबी ? वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सुनावलं, रोहित पवारांचं विधान