मुंबई : काल ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह दरम्यान मॉरिसने गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसने देखील स्वत: ला संपवून घटनास्थळीच आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. या घटननेचे सीसीटीव्ही फुटेज काही तासांत बाहेर आल्याने एकच खळबळ उडाली. तर या प्रकरणात मॉरिसचा सुरक्षा रक्षक मिश्रा याला पोलिसांनी अटक केली आहे. यातच आता मॉरिसने घोसाळकरांवर गोळ्या झाडल्याचा सीसी टीव्ही फुटेज समोर आला आहे. परंतु मॉरिसने आत्महत्या का केली ? त्या दोघांनाही मारण्याची सुपारी आणखी कुणी दिली होती का ? असा सवाल आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. आज पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
हेही वाचा…“मूर्खपणाचा डोंगर, संजय बांगर !” तर तुम्ही जेवण करू नका, बांगरांचा लहान मुलांना अजब सल्ला, विरोधकांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या दीड महिन्यापासून राज्यात सरकारमध्येच गॅंगवार सुरू झाला आहे. मागील काही दिवसापासून सरकारमधील मंत्र्यांसोबत गुंडांसोबत फोटो व्हायरल होत आहे. अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली, तो देखील एक गुंडच होता. हे प्रकरण वरकरणी वाटतं तितकं सोप्प नाही. सुड भावना असू शकते. परंतु त्या गुंडांनी आत्महत्या का केली ? हा प्रश्न मनात आहे. गणपत गायकवाडाच्या गोळीबाराचा व्हिडीओ कोणी न मागता समोर आला. तसाच अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूच्यासंदर्भात गोळ्या झाडतांनाचा व्हिडीओ आला आहे. परंतु गोळ्या कोण झाडत आहे. तो दिसत नाही. सुडभावने एखाद्याने हत्या केली. परंतु तो स्वत: वर गोळ्या का झाडून घेईल. त्यामुळे त्या दोघांनाही मारण्याची सुपारी आणखी कुणी दिली होती का ? अशी शंका उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केली.
हेही वाचा…भुजबळांची ह’त्या कशी अन् कधी करायची ? ‘त्या’ हॉटेलमध्ये शिजला कट, पत्रात धक्कादायक गोष्टी उघड
पोलिस अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर मॉरिसकडे परवानाधारक शास्त्र नव्हता. परंतु त्यांनी स्वत:चा बॉडिगार्ड ठेवला होता. त्याच्या शास्त्रातून गोळ्या चालवण्यात आल्या आहेत. परंतु त्या गोळ्या त्यांनी झाडल्या की ? आणखी कोणी झाडल्या ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो. यासंदर्भात आम्ही राज्यपालांकडे जाणार नाहीत. कारण आधीचे राज्यपाल चांगलेच कर्तव्य दक्ष होते. त्यानंतर आत्ताच्याच राज्यपालांसोबत या आरोपीचे फोटो आहे. असा टोला देखील ठाकरेंनी राज्यपालांना लगावला. यातच गणपती विसर्जनाच्या वेळी एका आमदाराने गोळीबार केला होता. त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. याउलट त्याला क्लिनचीट दिली आहे. खुल्या आम तरूणीवर जीवे मारण्याचा प्रकार घडला. त्यावरही कारवाई झाली नाही. पुण्यातील जी घटना घडली. त्यावर देखील कोणतीही कारवाई झाली नाही. असेही त्यांनी सांगितले.
अभिषेक घोसाळकर यांच्या गोळीबार प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली होती. त्यावर ठाकरेंनी फडणवीसांवर जोरदार टोलेबाजी केली आहे. भाजपच्या गुंडांनी धमकी दिली होती. पोलिसांनी यांना अडवून ठेवलं होतं. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच पोलिस प्रमुखांनी जनतेला उद्देशून असे रश्मी शुक्ला यांनी जनतेला उद्देशून पत्र लिहिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना मी कलंक बोललो, फडतुस बोललो. आता कलंक, फडतुस असे शब्द फारच सौम्य झाले आहेत. पण त्यांना निर्घून आता त्यांची मानसिक तपासणी करावी की काय ? असं वाटायला लागलं आहे. यातच महाराष्ट्राला एक मनोरूग्ण गृहमंत्री लाभलाय का ? असा सवाल देखील ठाकरेंनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…फडतूस-कलंक हे फार सौम्य शब्द झाले, महाराष्ट्राला ‘मनोरुग्ण’ गृहमंत्री लाभलाय का? ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं
हेही वाचा..पुण्यात मोठा राडा..! भाजपच्या कार्यकर्त्यांकडून महिलांना मारहाण अन् अर्वाच्च शिवीगाळ, सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या…
हेही वाचा…“गुंडगिरीचं हे घोंगावणारं वादळ सामान्यांच्या आणखी जवळ ! आता गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायलायच हवा”
हेही वाचा…जागा शिवसेनेची, दावा राष्ट्रवादीचा, लोकसभेच्या निवडणुकाकरिता उमेदवारासाठी ठराव मंजूर
हेही वाचा…“काल मृत्यू दारात उभा राहिला होता, केवळ तुमच्या प्रेमामुळे वाचलो”, मोठ्या राड्यानंतर निखील वागळेंची पहिली प्रतिक्रिया