नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील संसदेत शेवटच्या दिवशी राम मंदिरावर चर्चा करण्यात आली. अयोध्येत २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा स्थापना करण्यात आली. त्याबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहात यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये महाराष्ट्रातून खासदार श्रीकांत शिंदे यांनी सहभाग घेतला. मात्र यावेळी श्रीकांत शिंदे यांनी मोदींचा गौरव करत छत्रपतींचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे.
हेही वाचा…जागा शिवसेनेची, दावा राष्ट्रवादीचा, लोकसभेच्या उमेदवारासाठी ठराव मंजूर
राम मंदिर उद्घाटन मोदींच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलतांना श्रीकांत शिंदे यांनी एक वादग्रस्त विधान केले. ५०० वर्षानंतर जन्म घेणारे युगपुरूष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केला. त्यावरून राष्ट्रवादीने त्यांच्यावर जोरदार टिका केली आहे. छत्रपतींचा हा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. असं म्हणत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीच्या तख्तासमोर अक्षर:क्ष लोळण घातली असल्याचा टोला राष्ट्रवादीने लगावला.
हेही वाचा…“काल मृत्यू दारात उभा राहिला होता, केवळ तुमच्या प्रेमामुळे वाचलो”, मोठ्या राड्यानंतर निखील वागळेंची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, लोकसभेच्या श्रीकांत शिंदेंच्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विसरून ५०० वर्षानंतर जन्म घेणारे युगपुरूष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं. एकच प्रश्न या महाशयांना विचारायचाय. महाराष्ट्रात ज्या शिवछत्रपतींच्या नावावर राजकारण करता. पक्ष फोडता. त्यांचा दिल्लीत येऊन असा अपमान करता ? असं म्हणत राष्ट्रवादीने श्रीकांत शिंदे यांना चांगलचं सुनावलं.
छत्रपतींचा हा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही..!
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खा. श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीच्या तख्तासमोर अक्षरशः लोळण घातली आहे. लोकसभेच्या त्यांच्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विसरून ५०० वर्षांनंतर जन्म घेणारे युगपुरुष म्हणून… pic.twitter.com/npSAB5wvCY
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 10, 2024
READ ALSO :
हेही वाचा…निवडणुकांआधीच मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला ताप वाढवणारा सर्व्हे, एकनाथ शिंदेंची लोकप्रियता घटली?
हेही वाचा…“त्या दोघांनाही मारण्याची सुपारी आणखी कुणी दिली होती का ?”उद्धव ठाकरेंना उपस्थित केला सवाल
हेही वाचा…फडतूस-कलंक हे फार सौम्य शब्द झाले, महाराष्ट्राला ‘मनोरुग्ण’ गृहमंत्री लाभलाय का? ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं
हेही वाचा..पुण्यात मोठा राडा..! भाजपच्या कार्यकर्त्यांकडून महिलांना मारहाण अन् अर्वाच्च शिवीगाळ, सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या…
हेही वाचा…“गुंडगिरीचं हे घोंगावणारं वादळ सामान्यांच्या आणखी जवळ ! आता गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायलायच हवा”