बारामती : आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही चार ठिकाणी उमेदवार देणारच आणि त्याठिकाणी उमेदवार जिंकून आणणरच असं जाहीर विधान अजित पवार यांनी केले. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार गट सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली जाणार आहे. अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. तसेच सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांनाच उमेदवारी दिली जावी, अशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील म्हटले आहे. त्यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…फडतूस-कलंक हे फार सौम्य शब्द झाले, महाराष्ट्राला ‘मनोरुग्ण’ गृहमंत्री लाभलाय का? ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं
इंदापुरचे अजित पवार समर्थक वीर धवल यांनी बारामती लोकसभेतून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यावर तुमची भूमिका काय ? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, वीर धवल हे दौंड तालक्यातले आहेत. त्यांचे आई-वडिल माजी आमदार होते आणि त्यांचा इंदापुर तालुक्यात त्यांचा काडीचाही संबंध नाही. कुणी काय मागणी करावी? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शेवटी पक्ष कुणाला उमेदवारी द्यायची त्याबाबत निर्णय घेईल. अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
हेही वाचा….पुण्यात मोठा राडा..! भाजपच्या कार्यकर्त्यांकडून महिलांना मारहाण अन् अर्वाच्च शिवीगाळ, सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या…
दरम्यान, राज्यात पक्ष फुटीनंतर शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत देखील दोन गट पडले. त्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय चित्र बदलून गेले. यातच आता पुढच्या महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यावेळी महाविकास आघाडी विरूद्ध महायुती असा सामना होणार असून बारामतीत अजित पवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कुटुंबातीलच उमेदवार देणार असल्याच्या चर्चा राजकारणात सुरू आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय,” उद्धव ठाकरेंची टिका फडणवीसांना झोंबली
हेही वाचा..“राज्य सरकारला ताबोडतोब बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावा,” कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांचे चिरंजीवांनी दिल्लीच्या तख्तासमोर अक्षर:क्ष लोळण घातली, छत्रपतींचा केला अपमान”
हेही वाचा…निवडणुकांआधीच मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला ताप वाढवणारा सर्व्हे, एकनाथ शिंदेंची लोकप्रियता घटली?
हेही वाचा…“त्या दोघांनाही मारण्याची सुपारी आणखी कुणी दिली होती का ?”उद्धव ठाकरेंना उपस्थित केला सवाल