मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले आहे. उसाची एफआरपी दोन टप्प्यात शेतकऱ्यांना मिळणार आहे असा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. साखर कारखानदार तुपाशी अन् माझा शेतकरी उपाशी’ अशा पद्धतीचा हा एक तुघलकी निर्णय आहे. हे महाविकास आघाडी सरकार शेतकरी वर्गाचे नसून शेतकऱ्यांना मातीत घालणारे आहे. असं हे शेतकरी द्रोही सरकार आपल्या राज्यात काम करत आहे.
तारीख पे तारीख; एसटी विलिनीकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली, कधी होणार फैसला…?
या सरकारच्या विरोधात अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथून २६ फेब्रुवारीपासून रयत क्रांती संघटना व भाजपा किसान मोर्चा अशी संयुक्तरित्या आंदोलनाची घोषणा करत आहे, अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.
…तर अण्णा हजारे यांना आमचा पाठिंबा असणार- मेधा पाटकर
यावेळी बोलताना सदाभाऊ म्हणाले की शुगर केन कंट्रोल अॅक्ट १९६६ नुसार शेतकऱ्यांना केंद्र सरकारने जाहीर केलेली एफआरपी ऊस तुटल्यानंतर १४दिवसाच्या आत एकरकमी मिळाली पाहिजे हा कायदा होता. मात्र राज्य सरकारकडून या कायद्याची पायमल्ली करण्याचं काम सध्या सुरु आहे. शेतकऱ्यांना मिळणारी एफआरपी रक्कम ही आता दोन टप्प्यात मिळणार असल्याने शेतकऱ्यांचं कमालीचं नुकसान होणार आहे. यामुळे आम्ही सरकारच्या विरोधात मोठं आंदोलन उभं करणार आहे असं स्पष्टीकरण देखील सदाभाऊ खोत यांनी दिलं आहे. आता महाविकास आघाडी सरकार याबाबत कशी भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also:
- यशवंत ब्रिगेड’चा मंत्रालावर मोर्चा; येळकोट येळकोट जय मल्हार’ची घोषणाबाजी, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
- ब्रेकिंग : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ईडीच्या ताब्यात
- सात मार्चनंतर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार; चंद्रकांत पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट
- आयुक्तावरील शाईफेक प्रकरण; आमदार रवी राणा यांना न्यायालयाकडून ट्रान्झिट बेल मंजूर
- जिल्हा परिषदेचा सभापती ५ टक्के कमिशन मागतोय; खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप