मुंबई : यशवंत ब्रिगेडच्या वतीने धनगर समाजाच्या आरक्षण व प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई येथे २२ फेब्रुवारी रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. यावेळी धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर ” येळकोट येळकोट जय मल्हार” घोषणानी परिसर दणाणून सोडला.
चारी मुंड्या चीत करणाऱ्या गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याला खडसेंचा पलटवार; म्हणाले..;
यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी बापुराव सोलनकर, मल्लिकार्जुन पुजारी, अविनाश धायगुडे, दत्ता वाकसे, सुरेश अकरते, चंद्रकांत वाघमोडे, बलराम माडकर, महेश पिंगळे, यांना कार्यकर्त्यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले, व नंतर आझाद मैदान येथे आंदोलन स्थळी सोडून दिले.
तारीख पे तारीख; एसटी विलिनीकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली, कधी होणार फैसला…?
संघटनेचे प्रदेश अध्यक्ष बापुराव सोलनकर म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासून महाविकस आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून धनगर समाजावर मोठा अन्याय झाला आहे. धनगर समाजाला राजकारणातून हद्दपार करण्याचे षडयंत्र काही राजकीय पक्ष करीत आहेत, असा आरोप सोलनकर यांनी केला. समाजाला मिळणाऱ्या योजना निधी दिला नसल्यामुळे, धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न न सुटल्यामुळे धनगर समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये आरक्षणासाठी सरकार आणि धनगर समाज असा संघर्ष पहिला मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
Read also:
- ब्रेकिंग : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ईडीच्या ताब्यात
- सात मार्चनंतर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार; चंद्रकांत पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट
- आयुक्तावरील शाईफेक प्रकरण; आमदार रवी राणा यांना न्यायालयाकडून ट्रान्झिट बेल मंजूर
- जिल्हा परिषदेचा सभापती ५ टक्के कमिशन मागतोय; खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप
- …तर अण्णा हजारे यांना आमचा पाठिंबा असणार- मेधा पाटकर