मुंबई : गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकार आणि केंद्रीय यंत्रणा, भाजप यांच्यात संघर्ष सुरु असल्याचे चित्र समोर आले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वतीने अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, शिवसेना संजय राऊत हे वारंवार केंद्रीय यंत्रणा, भाजपच्या नेत्यांवर टीका करत आहे, पत्रकार परिषदा घेत आहेत.
राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांमध्येच रंगली जुगलबंदी; कुणाची सत्ता तर कुणाचं काय?
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मागील काही काळामध्ये एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरोधात बरेच पुरावे न्यायालयासमोर आणले होते. त्यानंतर वानखेडेंच्या नावावर असलेल्या बारचा परवाना देखील रद्द करण्यात आला होता. एवढंच नाही तर समीर वानखेडे यांना महाराष्ट्ट्र सोडून इतर ठिकाणी नियुक्ती घ्यावी लागली होती. मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत आता महत्वाची बातमी समोर आली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात कारवाई सुरु केली आहे. नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले आहे. कोणत्या कारणासाठी नवाब मलिक यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
चारी मुंड्या चीत करणाऱ्या गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याला खडसेंचा पलटवार; म्हणाले..;
ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळीच कारवाईस सुरुवात केली आहे. ईडीच्या विरोधात नवाब मलिक यांनी वारंवार टीका केली होती. नवाब मलिक यांनी काल एक वादग्रस्त पत्रकार परिषद घेतली होती ज्यामध्ये त्यांनी भाजपच्या काही नेत्यांची नावे घेतली होती. काल नावे घेताच आज लगेचच नवाब मलिक यांना ईडीच्या कार्यालयामध्ये बोलवल्याने थोडासा संभ्रम निर्माण झाला आहे. लवकरच माहिती समोर येईल असं देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
Read also:
- सात मार्चनंतर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार; चंद्रकांत पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट
- आयुक्तावरील शाईफेक प्रकरण; आमदार रवी राणा यांना न्यायालयाकडून ट्रान्झिट बेल मंजूर
- जिल्हा परिषदेचा सभापती ५ टक्के कमिशन मागतोय; खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप
- …तर अण्णा हजारे यांना आमचा पाठिंबा असणार- मेधा पाटकर
- तारीख पे तारीख; एसटी विलिनीकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली, कधी होणार फैसला…?