पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला आहे. ऐनलोकसभा निवडणुकीच्या तोडांवर भाजपचे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अतुल देशमुख यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. त्यांनी मंत्री दिलीप मोहिते पाटील आणि भाजपच्या ध्येय धोरणांवर नाराजी व्यक्त करत टिका केलीय. यश मिळालं तर ते दिलीप मोहिते पाटलांचं आणि अपयश आलं तर ते देशमुखांचं असेही त्यांनी सांगितलंय.
हेही वाचा…बच्चू कडूंनी भाजपचा दबाव झुगारला, अकोल्यासह रामटेकमध्ये महायुतीवर बच्चू कडूंचा प्रहार
माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तुरूंगात जावं लागलं आहे. माझ्यावर दोन ते तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं, अन् त्यावेळी यश आलं तर ते माझ्यामुळे आलं आहे. अन् अपयश आलं तर त्याच्या अपयशाचं खापर आमच्यावर फोडायचं. याच कारणामुळे आज राजीनामा दिल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…““माझा पक्ष प्रवेश चंद्रपुरच्या सभेत नाही तर दिल्लीत होणार”, एकनाथ खडसे यांचं मोठं विधान, शरद पवारांना मोठा धक्का
दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेतून आलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आलीय. आढळराव पाटलांच्या उमेदवारीला याआधी राष्ट्रवादी अजितदादांच्या नेत्यांनी प्रखर विरोध केला होता. मात्र अजित दादांनी नेत्यांची समजूत काढल्यानंतर आता ते निवडणुकीसाठी प्रचाराला लागले आहेत. यातच आता अजितदादांच्या कार्यकर्त्यांमुळे भाजपचे नेते राजीनामा देत असल्याचे दिसून येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“कुणी पैसे वाटले तर घ्या, मात्र मत महाविकास आघाडीलाच करा,” मावळाच्या उमेदवाराचा अजब गजब मतदारांना सल्ला
हेही वाचा…शरद पवार गटाकडून ‘रावेर’साठी सक्षम उमेदवार शोध संपला, ‘या’ बड्या नेत्याला उमेदवारी जाहीर
हेही वाचा…‘तळपत्या उन्हातील जनप्रेमाची शीतल झुळूक’, सुनेत्रा पवारांना लोकांचा वाढता प्रतिसाद
हेही वाचा…“उत्तराला अर्धवट तोडून माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला”, ‘त्या’ वक्तव्यावरून अर्चना पाटलांकडून स्पष्टीकरण
हेही वाचा…दहा लाख मतदारांपर्यंत पोहोचला ‘मोदींचा नमस्कार’, ‘हर घर मोदी परिवार’ अभियानात भाजपच्या दहा हजार कार्यकर्त्यांचा सहभाग