पिपंरी : मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे विरूद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही शिवसेना आमने-सामने आली असून दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. यातच पिंपरी येथील एका कार्यक्रमात संजोग वाघेरे यांनी मतदारांना अजब सल्ला दिला आहे. त्यामुळे त्याची चर्चा सध्या जोरदार सुरू झाली आहे.
हेही वाचा…““माझा पक्ष प्रवेश चंद्रपुरच्या सभेत नाही तर दिल्लीत होणार”, एकनाथ खडसे यांचं मोठं विधान, शरद पवारांना मोठा धक्का
पिंपरी चिंचवड भागात संजोग वाघेरे आपला प्रचार करण्यासाठी आले असता त्यांनी मोठं विधान करत नागरिकांना आवाहनही केलं आहे. रहाटणी येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात संजोग वाघेरे म्हणाले की, मावळ लोकसभा निवडणुक ही धनशक्ती विरूद्ध जनशक्ती असून मी सगळ्यांना सांगेल की विरोधक जे पैसे वाटतील ते सर्वांनी घ्या. मात्र मतदान महाविकास आघाडीला करा. असे आवाहन त्यांनी केलंय.
हेही वाचा…“संकल्पबद्ध होण्याची हीच ती वेळ”, आपली लेक म्हणून सर्वांनी मला पाठिंबा द्यावा “,अर्चना पाटलाचं मतदारांना आवाहन
यातच पिंपरी चिंचवड शहारातून अडीच ते पावणेतीन लांखांचं मताधिक्य मिळेल, तर खाली पनवेल, उरण आणि कर्जत येथे दोन लाखाचं मताधिक्य मिळून एकूण पाच ते साडेपाच लाखाच्या फरकाने निवडून येणार, अशी खात्री देखील संजोग वाघेरे यांनी व्यक्त करून दाखवली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवार गटाकडून ‘रावेर’साठी सक्षम उमेदवार शोध संपला, ‘या’ बड्या नेत्याला उमेदवारी जाहीर
हेही वाचा…‘तळपत्या उन्हातील जनप्रेमाची शीतल झुळूक’, सुनेत्रा पवारांना लोकांचा वाढता प्रतिसाद
हेही वाचा…“उत्तराला अर्धवट तोडून माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला”, ‘त्या’ वक्तव्यावरून अर्चना पाटलांकडून स्पष्टीकरण
हेही वाचा…दहा लाख मतदारांपर्यंत पोहोचला ‘मोदींचा नमस्कार’, ‘हर घर मोदी परिवार’ अभियानात भाजपच्या दहा हजार कार्यकर्त्यांचा सहभाग
हेही वाचा…बच्चू कडूंनी भाजपचा दबाव झुगारला, अकोल्यासह रामटेकमध्ये महायुतीवर बच्चू कडूंचा प्रहार