धाराशिव : संपुर्ण देशात लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून सर्व राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त झाले आहेत. अशातच धाराशिव लोकसभा मतदारसंघातून अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीच्या तिकीटावर उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचं मोठं आवाहन असणार आहे. मात्र अर्चना पाटील यांच्या पाठीमागे महायुतीची शक्ती आहे. यातच लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघातील बहुतेक सर्व आमदार महायुतीत सहभागी आहेत. यातच उमेदवारी मिळाल्यानंतर अर्चना पाटील यांनी मतदारांना उद्देशून एक पत्र लिहिलंय.
हेही वाचा…“महायुतीचा धर्म पाळणार, तटकरेंना ऐतिहासिक मतांनी संसदेत पाठवणार”, रायगडमध्ये निर्धार मेळावा
अर्चना पाटील यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पत्रात असे म्हटलंय की, धाराशिव लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठबळ देत त्यांचा ‘विकसित भारत‘ हा नारा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपा-शिवसेना व मित्रपक्ष प्रणित महायुतीची अधिकृत उमेदवारी दिल्याबद्दल पक्षश्रेष्ठींचे मनःपूर्वक आभार.. मी स्वतःला भाग्यवान मानते कारण माझ्या जडणघडणी मध्ये ३ उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचे संस्कार मला लाभले. माझे आजोबा स्व.उत्तमराव पाटील हे जनसंघाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे संस्थापक सदस्य होते. १९५७ मध्ये खासदार म्हणून त्यांनी लोकप्रतिनिधित्व केले. बालपणापासून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावात माझी जडणघडण झाली.
सौभाग्याने माझा विवाह अत्यंत प्रभावी राजकीय घराण्यात झाल्याने लोकनायक आदरणीय डॉ.पद्मसिंह पाटील साहेब व आदरणीय स्व. डॉ. चंद्रकलादेवी पाटील यांच्या समर्पित जनसेवा कार्याचे संस्कार माझ्यावर झाले. उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा क्षेत्राच्या विकास, प्रगती आणि उन्नतीसाठी पाटील कुटुंबीय नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे.. दुष्काळी क्षेत्र ते ऊस उत्पादक क्षेत्र ही ओळख आदरणीय डॉ.पद्मसिंह पाटील साहेब यांच्या जलक्रांतीने घडवली. तर आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी सर्वसमावेशक विकास क्रांती करून लोकसभा क्षेत्राला विविध पैलूंनी घडविण्यासाठी पुढाकार घेतला.
हेही वाचा…बारामतीत सुप्रिया सुळे यांना सर्वात मोठा धक्का, प्रवीण माने, दशरथ मानेंचा अजित पवारांना पाठिंबा
उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा क्षेत्रातील असंख्य प्रकल्प ज्यामध्ये ११ हजार कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता असलेला कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प असेल किंवा पिकविमा संघर्षाला मिळालेल्या यशातून लाखो शेतकऱ्यांना मिळालेला शेकडो कोटी रुपयांचा लाभ असेल.. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या अभ्यासू, संयमी आणि प्रामाणिक प्रयत्नांचे ते यश आहे. कौडगाव एमआयडीसी, टेक्निकल टेक्सटाईल पार्क, उस्मानाबाद (धाराशिव)- तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्ग, पायाभूत सुविधांचा विकास, तीर्थक्षेत्र तुळजापूर विकास आराखडा, शाश्वत सौर ऊर्जा प्रकल्प, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सरकारच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळवून देण्यासाठी केलेले प्रामाणिक कार्य अशा असंख्य कामांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा क्षेत्राचा शाश्वत विकास होताना दिसत आहे.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून हजारो नागरिकांना ‘आत्मनिर्भर’ करण्यासाठी केलेल्या कार्याचा परिणाम म्हणून सलग २ वर्ष धाराशिव जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. जगातील १० व्या स्थानावरून ५ व्या स्थानावर झेप घेतलेल्या आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. शेतकरी सन्मान योजना, रस्ते विकास, Micro Economy साठी जनधन योजना, उज्ज्वला गॅस, नमो ड्रोन दीदी.. अशा असंख्य अविश्वसनीय योजना त्यांनी राबविल्या आणि यशस्वी करुन दाखवल्या. आजवर कधीही मिळाला नाही इतका थेट लाभ नागरिकांना मिळाला.
कोरोना काळात केलेले लसीकरण असेल किंवा ८० कोटी नागरिकांना आजतागायत सुरु असलेले मोफत रेशन असेल.. माणुसकीला केंद्रस्थानी ठेऊन हे सरकार आजवर कार्यरत राहिले आहे. जगामध्ये वाढता प्रभाव आणि समाजातील शेवटच्या घटकाचा सर्वांगीण विकास या दोन्ही बाजूंचा समतोल राखण्यात मोदी सरकार यशस्वी ठरले आहे. २०४७ साली विकसित भारताचे स्वप्न साकारताना देशाच्या प्रत्येक लोकसभा क्षेत्राने या प्रगती कार्यात पुढाकार घेणे आवश्यक ठरणार आहे. उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा क्षेत्राचा सर्वसमावेशक, सर्वांगीण शाश्वत विकास साधायचा असल्याने आपल्याला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना ‘एक परिवार’ म्हणून पाठबळ देणे क्रमप्राप्त आहे.
मातोश्री स्व.डॉ.चंद्रकलादेवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्य करताना उस्मानाबाद (धाराशिव) मधल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबातील सदस्य समजून तळमळीने कार्य करण्याचे संस्कार त्यांनी माझ्यावर केले. त्यांच्याच इच्छेप्रमाणे उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा क्षेत्रातील हजारो नागरिकांचे मोफत रोगनिदान आजतागायत सुरु आहे. शेकडो लोकांच्या मोफत शस्त्रक्रिया तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून आपण करत आलो आहोत. २००६ सालापासून सामाजिक जीवनात सक्रिय कार्य करताना राजकीय क्षेत्राचा देखील उपयोग जनसेवेसाठी करता आला याचे विशेष समाधान वाटते.
२०१२ पासून आजतागायत राजकारणात सक्रिय असताना सामाजातील प्रत्येक घटकाची प्रगती साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आमदार राणाजगजितसिंह पाटील शाश्वत विकासाची धुरा सांभाळत असताना माझ्याकडे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचविण्याची जबाबदारी दिली गेली. सामाजिक आणि राजकीय कार्यात आजवर उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा क्षेत्र परिवारातील प्रत्येक सदस्याला उभारी देण्यासाठी मी कार्यरत राहिले. हे सगळं करणे शक्य झाले ते केवळ आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे आणि सहकार्यामुळे याची मला जाणीव आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांच्या सक्षम नेतृत्वात आपला पक्ष एक नवे स्वरूप धारण करत आहे. केंद्र सरकारच्या विकास केंद्रीत धोरणांना आपल्या महायुती सरकारने अधिक गती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या सक्षम नेतृत्वात महाराष्ट्र वेगवान विकास साधताना दिसत आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रगतीशील कार्यप्रणाली अनुसार आपल्या लोकसभा क्षेत्राची प्रगती साधण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत.. केंद्रातील आणि राज्यातील विकासाची गंगा आपल्या लोकसभा क्षेत्रात आणण्यासाठी संकल्पबद्ध होण्याची हीच ती वेळ!!! माझ्या उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा क्षेत्राला अत्यंत विकसित आणि आदर्श क्षेत्र म्हणून पुढे आणण्यासाठी जे कार्य सुरु केले आहे त्यासाठी ही लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आई तुळजाभवानीच्या कृपाशीर्वादाने आपल्या लोकसभा मतदार संघाला ‘आत्मनिर्भर‘ भारताचा एक विशेष घटक म्हणून आपल्याला पुढे आणायचे आहे, हा आपला मुख्य संकल्प आहे. आपली लेक म्हणून आपण सर्वांनी मला पाठिंबा, मतदानरुपी आशीर्वाद द्यावा, ही नम्र विनंती.. असेही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटणार? भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
हेही वाचा…“राजेंद्र राऊतांचा मला भावासारखा पाठिंबा मिळणार, अन् माझाच विजय होणार”, अर्चना पाटलांचा विश्वास
हेही वाचा…“सध्याच्या राजकीय परिस्थितीत देवेंद्र फडणवीसांना विनोद तावडेंनी चिटपट केलेय”
हेही वाचा…“आढळराव पाटील हा काम करणारा माणूस, जुन्नरमधून शिवाजी दादांना सर्वाधिक मते पडणार “, आमदार अतुल बेनके
हेही वाचा…“सुसंस्कृत पुण्याची परंपरा, तळजाई टेकडीवर उजळली”, सुनेत्रा पवार अन् धंगेकरांमध्ये रंगल्या राजकीय गप्पा