“राजेंद्र राऊतांचा मला भावासारखा पाठिंबा मिळणार, अन् माझाच विजय होणार”, अर्चना पाटलांचा विश्वास
बार्शी : धाराशीव लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीय. अर्चना पाटील यांच्यासमोर विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचं मोठं आवाहन असणार आहे. त्याच अनुषंगाने अर्चना पाटील यांनी आपल्या प्रचाराला सुरूवात करून दिलीय. यातच बार्शीत त्यांनी काही महिलांची संवाद साधला. तसेच अजितदादांचं बार्शीत काहीही वर्चस्व नाहीत. दादांचं गट कुठेही दिसत नाही. याठिकाणी राजेंद्र राऊत म्हणून आमदार आहेत. मग तुमचं याठिकाणी वचर्स्व वाढवणार आहेत की नाही, असा सवाल करण्यात आला. त्यावर त्यांनी मोठं भाष्य केलंय.
हेही वाचा…“अडीच लाख घरं, दहा लाख मतदार आणि दहा हजार कार्यकर्ते”, पुणे लोकसभा जिंकण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी सांगितली व्युहरचना
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अर्चना पाटील म्हणाल्या की, मी महायुतीची अधिकृत उमेदवार आहे. माझी उमेदवारी ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी तसेच ४०० पार करण्यासाठी देण्यात आली आहे. राजेंद्र गावित साहेब हे महायुतीचे घटक आहेत. माझे पती स्व: चा भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे काळजी करण्याचे कोणतंही कारण नाही. राजेंद्र राऊत यांचा मला भावासारखा पाठिंबा मिळणार आहे. त्यामुळे याठिकाणी माझाच विजय होईल. त्यामुळे माझा गट पक्ष हा महायुती वाढणार आहे. अशी प्रतिक्रिया अर्चना पाटील यांनी दिली आहे. ही निवडणुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून देण्यासाठी लढत आहे. त्यामुळे मोदींना निवडून देण्यासाठी आपल्याला घड्याळाचं बटन दाबावं लागणार आहे. असेही ते म्हणाले.
हेही वाचा…महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळांनी साधला, झैनी मशिदीत बोहरी बांधवांशी संवाद
धाराशिव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता नाराज नाही आहे. राष्ट्रवादीचा एक खासदार निवडून दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे सगळेच झपाटून कामाला लागले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी अनेक जण त्याठिकाणी उपस्थित होते. आता इच्छूक असणारे काही जण थोडेफार नाराज असतील परंतु त्यांची योग्य ती समजूत काढली जाईल. त्यांच्याशी अजितदादांशी संपर्क आहे. तसेच आमचं राष्ट्रवादीसोबत जुनं संबंध आहे. त्यामुळे जास्त काळ ते नाराज राहणार नाहीत. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.
दरम्यान, धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात महायुतीची ताकद अधिक आहे. औसात भाजपचे अभिमन्यु पवार, तुळजापुरमधून रामाजगजितसिंह पाटील, उमरग्यातून ज्ञानराज चौगुले, परांड्यातून डॉ. तानाजी सावंत आमदार आहेत. तर दुसऱ्या बाजूला बार्शीतून राजेंद्र राऊत या अपक्ष आमदाराने महायुतीला पाठिंबा दिलाय. तर उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात फक्त ठाकरे गटाचे कैलास पाटील आमदार आहेत. त्यामुळे याठिकाणी महायुतीची ताकद अधिक आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सध्याच्या राजकीय परिस्थितीत देवेंद्र फडणवीसांना विनोद तावडेंनी चिटपट केलेय”
हेही वाचा…“आढळराव पाटील हा काम करणारा माणूस, जुन्नरमधून शिवाजी दादांना सर्वाधिक मते पडणार “, आमदार अतुल बेनके
हेही वाचा…“सुसंस्कृत पुण्याची परंपरा, तळजाई टेकडीवर उजळली”, सुनेत्रा पवार अन् धंगेकरांमध्ये रंगल्या राजकीय गप्पा
हेही वाचा…“महायुतीचा धर्म पाळणार, तटकरेंना ऐतिहासिक मतांनी संसदेत पाठवणार”, रायगडमध्ये निर्धार मेळावा
हेही वाचा…बारामतीत सुप्रिया सुळे यांना सर्वात मोठा धक्का, प्रवीण माने, दशरथ मानेंचा अजित पवारांना पाठिंबा