मुंबई : ईडीकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणात, केवळ ‘इन्व्हेस्टिगेशन पार्ट’ इतकेच नमूद केलेली नोटीस मिळाल्यांनतर, परिवहन मंत्री अनिल परब यांना आज चौकशीसाठी सकाळी ११ वाजता कार्यालयात हजर राहावे, असे सांगण्यात आले होते. परंतू अनिल परब यांनी ईडीकडे १४ दिवसांची वेळ मागितली आहे. यासाठी त्यांनी ईडीला पत्र पाठवले असून, त्यात “मंत्री असल्याने काही ठरलेली कामे आहेत, यामुळे हजर राहू शकत नाही,” असे कारण सांगितले आहे.
परिवहन विभागातल्या भ्रष्टाचाराची होणार लोकायुक्तांकडून चौकशी, अनिल परबांना धक्का
दरम्यान, परब यांना नोटीस मिळाल्यानंतर परिवहन विभागातील अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावरही सोमवारी ईडीने छापेमारी केली. तसेच, इतर दोन ठिकाणी छापे टाकले आणि चौकशी सुरू केली आहे, तर दुसरीकडे, परिवहन विभागातील कथित वसुली प्रकरणात परब यांना धक्का बसला असून, विभागातील पदोन्नतीसाठी लाखो रुपयांची वसुली केल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकायुक्तांना दिले आहेत.
महाविकास आघाडी सरकारची ही ‘घोटाळा इलेव्हन’, किरीट सोमय्यांकडून ११ नावे जाहीर
त्यामुळे, आता परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. दरम्यान, अद्याप ईडीने परब यांच्या पत्रावर कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती असून, त्यामुळे परब यांच्या पत्रावर ईडी मुदत देणार की दुसरी नोटीस पाठवणार याकडे लक्ष लागून आहे. दुसरीकडे, या कारवाईनंतर परब यांनी थेट संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्यांनतर राऊत यांनी, “आम्ही या सगळ्या प्रकरणाला कायद्याने लढा देऊ, मात्र होत असलेली ही कारवाई सूडबुद्धीने आहे,” असं म्हटलं होतं.
“एक ना एक दिवस आमचेही दिल्लीत दिवस येतील”, ईडीच्या छापेमारीवरून संजय राऊतांचा इशारा
दुसरीकडे, ईडीकडून परब यांच्यावर सुरु असलेल्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, नारायण राणेंच्या अटकेच्या संदर्भातील परब यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यांनतर, त्यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्याने या ‘टायमिंग’ची सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्यामुळे, भाजपकडून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.
Read Also :
- प्रितम मुंडे आणि धनंजय मुंडेमध्ये रंगली जुगलबंदी; परळीतील कार्यक्रमात एकमेकांना काढले चिमटे
- मंदिरं दीर्घकाळापासून बंद, अण्णा इतके दिवस कुठं झोपले होते? राज ठाकरेंची चपराक
- चाळीसगावात पावसाचं ‘तांडव’! ५०० हुन अधिक जनावरे गेली वाहून; तर…
- “यांची बाहेर जायला फाटते, त्यात आमचा काय दोष?” निर्बंधांवरून राज ठाकरेंची जळजळीत टीका
- हे सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन