मुंबई : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घोषीत केलेला टाटा समुहाचा एअबस प्रकल्पही आता गुजरातला गेला आहे. तब्बल 22 हजार कोटी रूपये गुंतवणुकीचा असलेला हा प्रकल्प गुजरातला गेल्याने सत्ताधारी पक्षांवर विरोधकांनी टिकेची झोड उठविली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर आता हाही प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर जात असल्याने अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणू अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.
बळीराजाला मदत करणाऱ्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात..! उद्या मराठवाड्याचा दौरा
विरोधकांकडे बोलण्यासाठी काहीच नसल्याने ते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. 21 सप्टेंबर 2021 ला केंद्र सरकारने MoU केला होता. एक वर्षापुर्वीच प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय टाटा कंपनीने घेतला होता. त्याच्यावर आता चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. मागच्या सरकारने एकही पत्र या प्रकल्पासाठी पाठवलेलं नाही. काहीही प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आलेले नाही. केवळ युवापीढीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा आरोप देखील सामंत यांनी लावले आहेत.
“भाजप अन् मनसेचं नातं लिव्हइन रिलेशिनशिप जोडप्यासारखं”
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, वेदांता किंवा हा प्रकल्प आमच्या सरकारच्या आधी गुजरातमध्ये गेला आहे. मात्र आम्ही बेरोजगारांना वाऱ्यावर सोडणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितले आहे की, यापेक्षा मोठा प्रकल्प पुढच्या वर्षी महाराष्ट्रात आणला जाईल, असं देखील सामंत यांनी म्हटलं आहे. यावरून विरोधकांना सत्ताधाऱ्यांना चांगलचं धारेवर धरलं आहे.
“तुझ्या वडिलांना देखील धुळ चारली आहे, तुला पण..”; आमदार वैभव नाईक भडकले
दरम्यान, गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत? खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाहीय. हे तर दिसतच आहे. आता 4 प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजीनामा देणार का ? असा खोचक सवाल आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला केला आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
Read also
- “तुम्ही दारू पिता का?” कृषीमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना अजबच सवाल
- “किसान मरे या करे खुदकुशी, समा बॉॅंधती है शराब”; त्यावरून काॅंग्रेसने कृषीमंत्र्यांना डिवचलं
- “खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाही”; आदित्य ठाकरेंचा गहरा घाव
- “महाराष्ट्राची वाट लावण्याचे नियोजित काम सुरूय”; रूपाली पाटलांचा शिंदेंवर हल्लाबोल
- “देवेंद्र फडणवीस सरकारच्या घोषणांच्या गाजराचे उदंड पीक”; राष्ट्रवादीचा हल्लाबोल