मुंबई : मागील काही दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसानही मोठ्या प्रमाणात झालं आहे. याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन, त्यांना तातडीने कशी मदत करता येईल, या दृष्टीने ते शिवसेनेची यंत्रणा कार्यान्वित करणार आहेत.
“कृषीमंत्र्यांनी थातुरमातूर दौरे करून शेतकऱ्यांची टिंगल केली”; राष्ट्रवादीची जहरी टिका
उद्धव ठाकरे उद्यापासून परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पहाणी करणार आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानाचा आढावा घेऊन त्यांना शासकीय मदत तातडीने मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार आहेत. तसेच मराठवाड्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे .
“स्वत; उद्धव ठाकरे मैदानात आले की भाजपचा पालापोचाळा होईल”
हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे पूर्ण भिजून वाहून गेले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे . त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. तरीही राज्यकर्ते राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता नाही अशी जाहीर विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना तातडीने मदत कशी करता येईल. असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे.
Read also
- “भाजप अन् मनसेचं नातं लिव्हइन रिलेशिनशिप जोडप्यासारखं”
- “तुझ्या वडिलांना देखील धुळ चारली आहे, तुला पण..”; आमदार वैभव नाईक भडकले
- “महाराष्ट्रद्रोही सरकारचा जाहीर निषेध..” जिल्हा परिषदेतील 13,521 पदांची भरती रद्द केल्याने राष्ट्रवादी आक्रमक
- “चिपळूनमध्ये येऊन भास्कर जाधवांना ठोकून काढू”; प्रवीण दरेकरांचा इशारा
- “मोदींना खुश करण्यासाठी शिंदे-फडणवीस महाराष्ट्राला अजून किती लुटू देणार”?